top of page

इराण-इस्त्रायल युद्ध; भारताच्या 18 सदस्सीय पथकाला मिळाले ‘जिवनदान’


इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, इस्तायलमध्ये अडकलेल्या बंगळुरू पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी (बीपीएसी) च्या 18 सदस्यांच्या शिष्टमंडळातील सर्व सदस्य गुरुवारी (दि.19) रात्री उशीरा बंगळूरूला सुरक्षित परतले. हे शिष्टमंडळ जवळजवळ एक आठवडा अनिश्चितता आणि तणावाच्या परिस्थितीत अडकले होते.


डेक्कन हेरॉल्डच्या माहितीनुसार, हा गट 7 जून ते 13 जून दरम्यान विशेष दौर्‍यावर इस्त्रायलला गेला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि इतर संस्थानच्या संयुक्त सहकार्याने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या संशोधनाचा मुख्य उद्देश शहरी धोरणांमध्ये नागरिकांचा सहभाग, पाणी साठवण व्यवस्था आणि पर्यावरणीय शाश्वतता यासारख्या समस्या समजून घेणे होता.


13 जून रोजी होणार तेल अवीवाहू परतण्याचा प्लॅन इस्त्रायली हवाई क्षेत्र अचानक बंद झाल्यामुळे बिघडला. या प्रदेशात वाढत्या लष्करी तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शिष्टमंडळ तिथेच अडकले आणि त्यांच्या सुरक्षित परतीबद्दल प्रश्न उपस्थित झाले.


परिस्थितीचे गांभीर्य पाहून, बी.पीएसीचे व्यवस्थापक शरथ एस.आर. यांनी संकटाच्या या काळात इस्त्रायली कॉन्सुल जनरल ऑर्ली वेट्झमन यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, ऑर्ली वेट्झमन शिष्टमंडळासोबत होते आणि संकटाच्या वेळी संपूर्ण गटाची वाहतूक आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.


हवाई मार्गाने थेट उड्डाणे रद्द केल्यामुळे, गटाला तेल अवीवहून जॉर्डन सीमेवर रस्त्याने नेण्यात आले. तेथून बुधवारी रात्री एका विशेष विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात आले आणि अखेर ते सर्वजण गुरुवारी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास बेंगळुरूला पोहोचले. शरथ म्हणाले की, त्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता होती. सर्व सदस्य आणि त्यांचे कुटुंब आता खूप दिलासा देत आहेत. त्यांनी असेही सांगितले की, या संपूर्ण बचाव कार्यात अनेक एजन्सींनी विशेषत: परराष्ट्र मंत्रालय आणि कर्नाटक सरकारने एकत्र काम केले.

Comments


bottom of page