‘ऑपरेशन सिंदूर’ भारताचे पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईकपाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 स्थळे उद्धवस्त; शेकडो दहशतवाद्यांचा खातमा
- Navnath Yewale
- May 7
- 2 min read

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अखेर, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला योग्य उत्तर दिले आहे. ज्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहेच, शिवाय त्यांची झोप, शांती आणि आरामही नष्ट झाला आहे. दहशतवाद्यांना पोसणारा शेजारी देश कदाचित ही जखम कधीच विसरू शकणार नाही. 6-7 मे च्या रात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पिओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यापैकी 4 पाकिस्ताचे आणि 5 पाकव्याप्त काश्मीरमधील होते.
ही ती ठिकाणे आहेत, जिथे पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. बहावलपूरवर जैश- ए- मोहम्मदचे राज्य आहे. आणि मुरीदके हे लष्कर-ए- तैयबाचा अड्डा आहे. गुलपूर, भिंबर, चक अमरु, कोटली, बाग ही जैशची प्रशिक्षण केंद्रे मानली जातात तर सियालकोट आणि मुजफ्पराबाद ही हिजबुल मुजाहिद्दीनचे आवडती ठिकाणे मानली जातात. माहितीनुसार, या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे 50 हून अधिक दहशवादी मारले गेले आहेत.
भारताचा काळजीपूर्वक पाकिस्तानवर हल्ला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वांच्या मनात एकच गोष्ट होती की, काहीतरी मोठे घडणार आहे... तर विरोधी पक्ष सरकारच्या वृत्तीवर आणि हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत होते की, इतका विलंब का? पण भारताने सूडाच्या आगीत घाईघाईने पावले उचलली नाहीत, उलट काळजीपूर्वक विचार करुन पाकिस्तानात घुसून गोळ्या झाडल्या. माहितीनुसार रॉ च्या अहवालानंतर पाकिस्तानमधील ही ठिाणे ओळखण्यात आली भारताच्या हवाई हल्ल्यानंतर संरणि मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, भारताने लक्ष्य गाठण्यात संयम बाळगला.
म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारल्यानंतर ज्या प्रकारे गोळ्या झाडल्या. त्यापैकी एकाने जखमी महिलेला सांगितले होते की, ‘आम्ही तुला मारणार नाही जाऊन हे पंतप्रधान मोदींना सांग’ हे उघडकीस आल्यानंतर प्रत्येक भारतीय संतापला होता आणि प्रत्येकजन मोदींच्या उत्तराची वाट पाहत होेते. आज ते उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या रुपात आले आहे.
‘सैन्याने आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली वाहिली’
दरम्यान, पहलगाम दहशतावादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांचे नातेवाईक मनोज द्विवेदी म्हणाले की, “ 22 एप्रिल रोजी जेव्हा आमच्या मुलाने प्राण गमावले, तेव्हा आम्ही म्हटले होते की, आमच्या देशात क्रांती येणार आहे आणि आम्हाला खात्री होती की, पंतप्रधान मोदी दहशतवाद संपण्यासाठी कठोर पावले उचलतील आज सैन्याने आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली वाहिली. याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो”
Comments