‘करारा जवाब मिलेगा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पाकिस्तान्यांना ठणकावले
- Navnath Yewale
- Apr 27
- 2 min read

पहलगाम हल्ला भारतावरचा हल्ला आहे, तो हल्ला देशाच्या आत्म्यावर हल्ला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. या हल्ल्यात 27 पर्यटक शहिद झाले असून , त्यातले 6 महाराष्ट्रातील आहेत. अनेक पर्यटक त्यावेळी काश्मीमरमध्ये अडकले होते. त्यांना आधार देण्याची गरज होती.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे त्यांची मेडिकल टीम घेवून पोहचले होते, गिरीष महाजनही राज्य शासनाच्या वतीने गेले होते तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सुद्धा तिथे गेले होते. त्यातही विरोधक राजकारण करत आहे, हे दुर्दैव आहे. पाकड्यांना भारत धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.,त्यांचे नामोनिशान मिटवले जाईल, घरात घुसून मारनेवाला हा भारत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘करारा जवाब मिलेगा’ असं पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठणकावलं ते बुलढाणा येथील सभेतून बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 27 एप्रिल रोजी बुलढाणा येथे आभार दौरा होता, तेव्हा आभाराच्या जाहिर सभेतून ते बोलत होते. मंचावर मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड यांच्यासह माजी आमदार संय रायमूलकर, शशिकांत खेडेकर, माजीमंत्री तथा माजी खासदार आनंदराव आडसूळ, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आदींची उपस्थिती होती.

सभेच्या प्रारंभीच पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोणाचाही सत्कार यावेळी ठेवण्यात आला नाही. सभेत उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा भर हा काश्मीर केंद्रीत होता.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जे पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या महाराष्ट्रात राहत आहे त्यांनी त्वरीत चालते व्हावे. नाहीतर पोलिस शोधतील अन जागेवरच ठोकतील. ही आरपाची लढाई आहे. आता पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय भारत राहणार नाही, असे सांगत ‘करारा जवाब मिलेगा’ असं पाकिस्तानाला ठणकावलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरला जाण्यावरुन विरोधक करत असलेल्या टिकेचा खरपूस सामाचार घेतला. शिंदे साहेबांचा मुलगा मदतीसाठी आधीच काश्मीरला गेला होता, हे संजय राऊतच्या बापालाही माहिती नसेल.. अशी टिका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारी विमानाने तर अनेकांना आणलेच पण स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करत तीन विमानातूनही अनेक पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं. कुठल्याही आपत्तीत धावून जाणारे शिंदे असून ते घरात बसून फेसबुकवरुन काम करत नाहीत, असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.
‘तब तक भारत माता का आँचल निलाम नही होने देंगे’..
आधी मंत्री गुलाबराव पाटील तर नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानविरुद्ध शेरो-शायरी करून सभेमध्ये जोश भरला. ‘रात का तारा है तारा ही रहेगा, जन्मो तक नजरा है नजारा ही रहेगा.. दहशत से ना डरे, हम ना डरेंगे, कश्मीर हमारा है हमाराही रहेगा!’ हा शेर आधी भाषणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या भाषणात शेर म्हटले. ‘लहू का कतरा तिरंगा बन जायेंगा, जो हम पे वार करेगा वो मिटा दिया जाएगा.. अब कोई हद नही सरहद नही, जो आग लगाएगा उसको जला दिया जाएगा!’ या शायरीसह शेवटी आजादी की कभी शाम नही होने देंगे , शहिदों की कुर्बानी बदनाम नही होने देंगे.. बची हो जो एक बूंद लहू की, तब तक भारत माता का आँचल नीलाम नही होने देंगे!’ अशा शेरो-शायरीत त्यांनी मनोगत व्यक्त केले.
Comments