“काश्मिर” पृथ्वीवरील स्वर्ग आता नरक बनले
- Navnath Yewale
- Apr 25
- 1 min read
पहलगाम हल्ल्यावर सलमान खानचे मोठे विधान

जम्मू- काश्मिरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 22 एप्रील 2025 रोजी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हदरला आहे. सामान्य लोकांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पहलगाम हल्ल्याचा निषेध
या संदर्भात बॉलिवूड सुरपस्टार सलमान खानने या घटनेत निष्पाप लोकांना लक्ष्य केल्याचा तिव्र निषेध केला अहो. सलमान खानने त्याच्या एक्स हँडलवरुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सलमान खानने एक्स-काश्मिरवर लिहिले आहे की, पृथ्वीवरील स्वर्ग आता नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. एका निष्पाप व्यक्तीलाही मारणे म्हणजे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखे आहे.
पहलगाम हल्ल्याबद्दल शाहरुख खानचे वक्तव्य
सलमान खानच्या आधी सुपरस्टार शाहरुख खाननेही या दहशतवादी हल्याचा निषेध केला आहे. शाहरुख खानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “ पहलगाममधील हिंसाचाराबद्दलचे दु:ख आणि राग शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. अशा वेळी, आपण फक्त पिडीत कुटुंबांसाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो. आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त करू शकतो. चला आपण एकत्र येऊ आणि एक राष्ट्र म्हणून अधिक मजबूत होऊ.”
Comments