top of page

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना मिळणार मंत्रिपद?





लोकसभा निवडणूका होऊन पुढिल महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. तर दूसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणूका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. त्यामुळे या निवडणूकीपुर्वी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही फेरबदल केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे या विस्ताराकडे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्रातून या विस्तारात कोणला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


बिहारमध्ये या वर्ष अखेरीस विधानसभा निवडणूका होणार आहेत. या ठिकाणच्या आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षालाही केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यासोबत तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आणि माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.


वर्षभरापूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली नव्हती. त्यांना मंत्रिमडळात राज्यमंत्रिपद दिले जात होते. मात्र, राष्ट्रवादीला कॅबिनेटचे मंत्रीपद हवे होते. त्यामुळे नंतरच्या विस्तारात संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराची संख्या त्यावेळी कमी होती.

वर्षभराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) अजित पवार गटाच्या खासदाराची संख्या वाढली आहे. राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विजयी झाल्या आहेत. तर दूसरीकडे उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराचे लोकसभा व राज्यसभा मिळून संख्याबळ चार झाले आहे.

येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे विस्तारात त्यांना संधी मिळू शकते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच त्यांनी दोन मंत्रिपदाची मागणी केली होती. त्यांना त्यावेळी एक मंत्रपद देण्यात आले होते. त्यानुसार बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली होती.


विधानसभा निवडणूकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळीच्या वाटाघाटीत केंद्रात आणखी एक मंत्रीपद शिवसेनेला मिळू शकते, अशी चर्चा होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जर मंत्रीपद आले तर त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यापैकी तीन टर्म मावळचे खासदार असलेले श्रीरंग बारणे व कल्याण डोंबीवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पैकी कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता आहे.

या विस्तारात भाजपकडून महाराष्ट्रात ऐनवेळी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या एका नेत्याला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातील शिवसेना ( शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळासाठी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रातून नितिन गडकरी पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेच प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत.

Comments


bottom of page