कोलकाता : हॉटेलमध्ये भिषण आग, 14 जणांचा मृत्यू; अनेक लोक अडकले...
- Navnath Yewale
- Apr 30
- 1 min read

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यातील फालपट्टी मासेमारी क्षेत्रात 29 एप्रिलच्या रात्री हा अपघात झाला. सध्या हॉटेलमध्ये अनेक लोक अडकले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्ना नंतर अग्निशामक दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
कोलकाता पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज हॉटेलच्या आवारात रात्री 8:15 वाजता अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. रात्रीच्या वेळेत बचाव कार्यासाठी काही वेळ अडथळा निर्माण झाला पण बचाव कार्यासाठी आग्निशामक दलाने अथक प्रयत्न केले आणि पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या दुर्घटनेत चौदा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि पथकांनी अनेक लोकांना वाचवले आहे. आगीचे कारण काय आहे हे सध्या कळू शकलेले नाही. या अपघाताच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
Comments