छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका- अमित शाह
- Navnath Yewale
- Apr 12
- 2 min read

“स्वत:ला आलमगीर म्हणवणारा इथेच महाराष्ट्रात पराभूत झाला आणि इथेच त्याची कबर खोदली. मी महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती करायला आलोय. शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शह म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची 345 व्या पुन्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले. यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मी आतापर्यंत अनेक युगपुरुषांचे जीवन चरित्र वाचले आहेत. पण, प्रचंड इच्छाशक्ती, धाडस, अकल्पनीय रणनिती आणि रणनीती पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला एकत्र जोडून अपराजित सेनेची निर्मीती केली. हे शिवछत्रपतींशिवाय कोणीच केलेले नाही. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, ना त्यांच्यासोबत भाग्य होते, सेना नव्हती एक मुलागा धाडसाच्या जीवावर पूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र देवून गेले. बघता बघाता त्यांनी 200 वर्षेअसलेल्या मुघलशाहीला पराभूत करुन देशाला स्वतंत्र करण्याचे काम केले, असंही अमित शहा म्हणाले.
ज्यावेळी अकपर्यंत मावळ्यांची सेना पोहोचली, बंगाल, तामिळनाडूपर्यंत सेना पोहोचली तेव्हा सगळ्यांना अपला देश वाचला असे वाटले. आमची भाषा, संस्कृती वाचली. आज आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा देश नंबर एकला असणार आहे, असंही शाह म्हणाले.
“आलमगीरची कबर महाराष्ट्रातच..”
अमित शाह म्हणाले, जिजाऊंनी बाल शिवाजी यांच्यावर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी त्या संस्काराचा वटवृक्ष बनवला आणि त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी. शिवाजी महाराजानंतर औंरंगजेब जोपर्यंत जीवंत राहिला तोपर्यंत ते त्याच्याविरोधात लढत राहिले. स्वत:ला आलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराभूत होऊन इथेच त्याची कबर बांधली, असंही अमित शाह म्हणाले.
अमित शाहांसमोर उदयनराजेंच्या मागण्या
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संंभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. 10 वर्षे बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकरुन कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माृण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावं. जेणेकरुन एखादा स्वत:च्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैंरसमज निर्माण होत आहे, यामुळे एक सेंसर बोर्डची स्थापना व्हावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
Comments