top of page

छेडखानी, लग्न जुळताच ब्लॅकमेलिंग, तरुणीन उचललं टोकाचं पाऊल



छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमधील के.एस.के महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक कदम असं या प्रकरणातील आरोपचं नांव आहे. पिडीत मुलींच लग्न ठरलं होतं. अभिषेक कदम हा तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेतला.


या घटनेला एक महिना पूर्ण झाला असला तरी देखील न्याय मिळत नाही, त्यामुळे पिडीतेच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. सध्या हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. धराशिव पोलिसांनी कसलंही सहकार्य केले नाही, असा आरोप साक्षीची आई कोयना विटेकर यांनी केला आहे. माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये, त्यासाठी यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील पिडीत कुटुंबाने केली आहे. दरम्यान, धारशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम याला अटक केली असून त्याची जामीनावर सुटका झाली आहे.


अभिषेक कदम या आरोपीने या आधी देखील अनेक मुलींची छेडछाड केली आहे. त्याच्यावर यापूर्वी दोन मुलींची छेड काढण्याचा गुन्हा आहे. के.एस.के. महाविद्यालयात हा प्रकार घडला. पिडीत तरुणीने आपल्या आयुष्याची अखेर केल्यानंतर के.एस.के. महाविद्यालय प्रशासन अद्याप गाफिल आहे. याच महाविद्यालययात महिनाभरात तीन मुलींनी आपलं आयुष्य संपवल्याचं समोर येत आहे.


या प्रकरणात अरोपी अभिषेक कदम याच्यासह त्याची बहिण शितल कदम या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शितल कदम ही रेल्वे पोलिस दलात कार्यरत आहे. त्यामुळेच धाराशिव पोलिसांकडून करावाई दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. या प्रकरणात अनेक आमदारांनी देखील तपास अमलदार यांना फोन केल्याचे समजते.


धाराशिवचे पोलिस उपाधिक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडे हा तपास होता. स्वप्नील राठोड यांना पिडीत कुटुंबाला तासंतास कार्यालयाच्या बाहेर वेठीस ठेवले. आमची कुठलीही साक्ष पोलिस उपाधिक्षक स्वप्नील राठोड यांनी घेतली नाही. उलट तुमच्या मुलीने असं का केलं, असे आम्हाला विचारण्यात आलं, असाही आरोप कुटुंबियांनी केला आहे.

Comentários


bottom of page