जंगले नाहीशी होत आहेत, हिमनद्या फुटत आहेत ...प्रजाती देखील धोक्यात!
- Navnath Yewale
- Apr 22
- 2 min read

जागतिक पृथ्वी दिन म्हणजे पृथ्वी वाचवण्याबद्दल लोकांना जागरुक करण्याचा दिवस. खरं तर, औद्योगिक युगापूर्वी, पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संसाधने योग्य आणि संतुलित स्वरुपात अस्तित्वात होती. वाढत्या लोकसंख्येसोबत लोकांच्या गरजा वाढत गेल्याने या संसाधनांचा वापर सुरू झाला. पण आपल्या छोट्या सवयींचाही पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो.
आज म्हणजेच 22 एप्रील हा जागतिक वसुंधरा दिन आहे. औद्योगिक युगापूर्वी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संसधाने पाणी , जंगल, जमीन , हवा , हिमनदी इत्यादी योग्य आणि संतुलीत स्वरुपात होती. वाढत्या लोकसंख्येसोबत लोकांच्या गरजा वाढत गेल्याने या संसाधनांचा वापर सुरू झाला जीवाश्म इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे जागतिक तापमानवाढीचे संकट निर्माण झाले.
यानंतर अशा उपयायोजनांवर भर दिला जाऊ लागला, ज्यामुळे जगाचा विकास होईल आणि पृथ्वी सुरक्षित राहील. स्वच्छ ऊर्जेद्वारे पृथ्वीवरील सर्वात मोठे संकट कसे टाळता येईल याचा शोध घेणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
आपण धरतील आई म्हणतो. कारण असे की, मानवाचा जन्म जरी स्त्रीच्या पोटी झाला असला, तरी तो या पृथ्वीवरच राहतो. तो पृथ्वीने दिलेल्या नैेसर्गिक गोष्टींवर जगतो. जन्मानंतर माणूस त्याच्या आईशिवाय जगू शकतो. परंतु पृथ्वी आणि नैसर्गिक गोष्टींशिवाय तो क्षणभरही जगू शकत नाही. आपण आपल्या गरजांसाठी नैसर्गिक संसाधनांचा खूप वेगाने वापर करत आहोत. जर हे जतन केले नाही, तर पृथ्वी भविष्यातील पिढ्यांना जगण्यासाठी काहीही देऊ शकणार नाही. पृथ्वी वाचवण्यासाठी सुरू असलेल्या, प्रयत्नांमध्ये तुम्ही महत्वाचे योगदान देऊ शकता. तुम्हाला फक्त या पाच गोष्टी करायच्या आहेत.
जलसंधारण : ‘पाणी हेच जीवन आहे’, ही केवळ एक म्हण नाही.पृथ्वीवर पाण्याचे अस्तित्व हे एक वरदान आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी वाचवण्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे खूप महत्वाचे आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे जगाची स्थिती बिकट होत चालली आहे. म्हणून प्रत्येकाने शक्य तितके पाण वाचवले पाहिजे. यासाठी, पाण्याच्या इतर स्त्रोतांकडे लक्ष द्या. नळ व्यवस्थीत बंद करा. अनावश्यकपणे पाणी वाया घालवू नका. पावसाचे पाणी साठवा आणि वापरा.
कचरा व्यवस्थापन: पृथ्वीवरील कचराही वाढत आहे. योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापराच्या अभावामुळे,सर्वत्र कचर्याचे ढीग आहेत, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण होते. अशा परिस्थितीत, घरांमधून बाहेर पडणारा कचरा विघटनशील आहे याची खात्री करणे हे आपले काम आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेळा टाका.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिथिन पिशव्यांचा वापर कमी करा.
वायू प्रदूषण कमी करा : सध्या वायू प्रदूषण खूप वाढले आहे. लोकांसाठी, उघड्या हवेत श्वास घेणे म्हणजे विष श्वास घेण्यासारखे आहे. वाहनांची वाएती संख्या आणि विमानांमधून निघणार्या धुरामुळे प्रदूषण पसरते. अशा परिस्थितीत, तुम्ही वाहनांचा वापर कमी करू शकता आणि जर तुम्हाला जास्त प्रवास करावा लागत नसेल , तर तुम्ही सायकल वापरू शकता. तुम्हाला हवे असेल तर सार्वजनिक वाहतूक वापरा
रसायनांचा वापर कमी करणे: आधुनिक भारतात जवळजवळ प्रत्येक वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात. अशा परिस्थितीत रासायनिक गोष्टींचा वापरही वाढला आहे. शेतीसाठी रासायनिक पदार्थांच्या वापराप्रमाणेच, आंघोळीपासून ते कपडे आणि भांडी धुण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जात आहे. ही रसायने ओढ्या नाल्यांमधून नद्यांमध्ये जातात आणि त्यांना प्रदूषित करतात. नद्यांचे हेच पाणी अनेक कारणांसाठी वापरले जाते, जे पृथ्वी आणि मानव दोघांसाठीही हानिकारक आहे.
विजेचा वापर कमी करा : विजेची गरज वाढत आहे पण विजेचा अपव्यय नैसर्गिक संसाधनांचे शोषण देखील करत आहे. प्रत्यक्षात, विज निर्मितीसाठी कोळशाचा वापर केला जातो. या शिवाय अनेक नैसर्गिक वायूंपासूनही वीज निर्मीती केली जाते. अशा परिस्थितीत पर्यावरणीय प्रदूषण वाढते. प्रदूषणामुळे पृथ्वी हळूहळू नष्ट होत आहे. अशा परिस्थितीत गरज असेल तेव्हाच वीज वापरा. अनावश्यकपणे दिवे आणि पंखे चालू ठेवू नका.
Comments