top of page

जरांगे पाटील यांच्याकडून कस्पटे कुटूंबीयांचे सांत्वन वैष्णवी हगवणे ची आत्महत्या नसून हत्या आहे; सामूहिक कट रचून एकप्रकारे हत्या केली



वैष्णवी हगवणे प्रकरणात पाच आरोपी आहेत, त्यामुळे ही आत्महत्या नूसन हत्याच आहे आणि तसं कस्पटे कुटुंबीयांचही म्हणनं आहे. वैष्णवीला न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटनार नसल्याचा विश्वास देत मनोज जरांगे पाटील यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन के व घटनेची माहिती घेतली .


वैष्णवीच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर अपेक्षाभंग होईल आणि गृहमंत्रालय हे कमकुवत आहे. असा समाज होईल. असं परखड मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल आहे. तसे महाराष्ट्रातील हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.


महिला आयोगाने योग्य रित्या तक्रारीच निवारण करायला हवं. कठोर कारवाई व्हायला हवी. महिला आयोग आता सुधाररायला हवं. सत्ताधारी पक्षाच महिला ओयाग अध्यक्ष आहेत. तात्काळ महिला आयोगाने ऍक्शन घ्यायला हवी पुढे ते म्हणाले वैष्णवीला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही तपास अधिकार्‍यांनी कस्पटे यांना वेळोवेळी माहिती द्यावी. तपास सीआयडीने सुद्धा करावा.


कुटुंबाला अंधारात ठेवून तपास होऊ नये. पुढे ते म्हणाले, घटनेचा निषेध करतो. ही क्रूर घटना आहे. कस्पटे कुटुंबासोबत आम्ही आहोत. वैष्णवी सामूहिक हत्या करण्यात आली आहे. ही आत्महत्या नाही. वैष्णवीच्या अंगावर व्रण आहेत. षडयंत्र रचून वैष्णवीला मारल आहे. 120 (ब) कलम लावलं पाहिजे.


सरकारी वकिल लवकरात लवकर नेमण्यात यावा. मोक्का लावतो म्हटले त्यांची प्रक्रिया सुरू आहे का? सत्तेतील आरेापी असल्याने हे प्रकरण दाबले अस वाटायला नको. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर अपेक्षा भंग होतील. गृहमंत्रालय हे कमकुवत आहे असा समज होईल. असही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page