ठाकरे बंधूचे मनोमिलन; महायुती सावध!
- Navnath Yewale
- Apr 20
- 2 min read

राज्याच्या राजकाणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या ‘साद - प्रतिसादा’ चं वादळ उठलं आहे. सत्ताधारी मायुतीकडून युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली जात आहे. महाविकास आघाडीने तर देव पाण्यात ठेवले आहेत. महायुतीमधील शिवसेना (शिंदे) पक्षाकडून सरळ नकारात्मक भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या कडून ठाकरे बंधूच्या मनोमिलना बाबत पॉझीटिव्ह भूमिका मांडली जात आहे. पण त्यास शिवसेना (शिंदे) पक्षाच्या भूमिकेची झालर असल्याचे दिसत असल्याने आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर ठाकरे बंधूच्या युतीपूर्वीच महायुती मात्र सावध झाली आहे.
शिवसेना फूटी नंतर लोकसभेचया सर्वत्रीक निवडणूकांमध्ये मनसेने महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे महायुतीला निश्चित मुंबई, मुंबईउपनगरांसह नाशिक, पुणे महानगरात ज्या ठिकाणी मनसेचं प्राबल्य आहे अशा किमान पाच जागांवर महायुतीला वर्चस्व मिळालं हे कोणी नाकारु शकत नाही. 48 पैकी तब्बल तीस जागांवर विजय मिळविलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसला 13, राष्ट्रवादीला 8 तर शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाला 9 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे लोकसभेला शिवसेना (उ.बा.ठा.) काँग्रेस, भाजपच्या पाठोपाठचा तिसरा मोठा पक्ष ठरला.
विधानसभेला मात्र चित्र वेगळ राहिलं, लोकसभेला मिळालेल्या यशाने महाविकास आघाडी विधानसभेची रणनिती आखण्या ऐवजी जागा वाटपाचं भेंडोळं सोडण्यात मग्न राहिली. त्यातच मनसेने स्वबळाचा नारा दिला ही मोठी महाविकास आघाडीसाठी आतबट्यातली बाजू ठरली. मुंबई सह उपनगरातील विधानसभेच्या बहूतांश जागा मनसेच्या उमेदवारास पडलेल्या मतांच्या पटीच्या फरकाने पडल्या, त्याचा तोटा सर्वाधिक शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाला सोसावा लागला.
मुंबई, उपनगरासह राज्यात मराठी, हिंदू मतांचे विभाजन करण्यात महायुतीचा डाव यशस्वी झाल्याने बक्कळ बहूमताच्या जोरावर महायुतीने सत्ता स्थापन केली. दरम्यान, नुकत्याच होवू घातलेल्या महापालिका निवडणूकांसाठी सर्वच राजकिय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता एकतत्वी, एकाच मुद्याचे दोन पक्ष एकत्र येत असतील तर दोन्ही पक्षांना एक माणनार्या वर्गात उत्साह निश्चित आहे. महाविकास आघाडीमध्येही तेवढाच उत्साह म्हणावा लागेल.
परंतु महायुतीचा जर विचार केला तर, ठाकरे बंधूच्या युतीबाबत महाविकास आघाडीतील प्रतिक्रयापूर्वीच महायुतीच्या प्रतिक्रिया सकारात्मक येत असल्याने निश्चित महायुतीने सावध पवित्रा घेतला हे निश्चित आहे. ठाकरे बंधूच्या युतीमुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीमध्ये मराठी मतांच्या विभाजनाच्या फॉर्म्युल्यावर पाणी फिरले जाणार हे समोर ठेवून महायुतीला रणनिती आखावी लागणार आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी एक पाऊल मागे अशीच भूमिका आता महाविकास आघाडीतील इतर पक्षांना घ्यावी लागणार आहे, ती सोईची ठरेल यात शंका नाही.
प्रतिक्रियाच बरच काही सांगून जातात
मुख्यमंत्री फडणवीस : ठाकरे बंधूच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मतभेद बाजूला सारुन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यात गैर काय आहे.
अजित पवार : ‘ठाकरे बंधू एका कुटूंबातले आहेत, काय करावं आणि काय नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे’. प्रत्येकाने सद्सद् विवेक बुद्धीने जे वाटेल तो निर्णय घेण्याचा आधिकार ज्याला-त्याला आहे. त्यांच्यामध्ये नांक खूपसायचं काय कारण.
संजय शिरसाट : सर्वव्यापी दृष्टीकोण समोर ठेवून राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे, दोन्ही ठाकरे बंधूची युती व्हावी या मनाचा मी होतो आणि आहे . पण तसं होणार नाही, उद्धव ठाकरे सध्यातरी राष्ट्रवादी (श.प.) आणि काँग्रेस पासून बाजूला सरतील असं वाटत नाही.
Comentarios