धनंजय मुंडे यंच्या विरोधात अंजलि दमानिया आक्रमक!
- Navnath Yewale
- Apr 28
- 1 min read
राजीनाम दिला मग, मंत्रालयात ऑफिस कशासाठी?

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. धनंजय मुंडे यांनी महाविकास आघडीच्या काळात कसा भ्रष्टाचार केला या संदर्भातले आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केले.
तसंच वाल्मिक कराडवरही त्यांनी आरोप केले आहेत. दोनवेळा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. धनंजय मुंडेनी राजीनामा देखील दिला त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे.
यावरुन धनंजय मुंडे विरोधात अंजली दमानिया पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मंत्रालयात धनंजय मुंडेच्या नावांच कार्यालय कशासाठी? असा ट्विटरवर फोटो पोस्ट करत अंजली दमानियांनी थेट सवाल केला आहे. त्यांनी मंत्रालयातील धनंजय मुंडेच्या कार्यालयाचा व्हिडीओ तसेच त्यांच्या नावाची पाटी देखील पोस्ट केली आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी रान उठवले
राज्यातील विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या राजीनम्यासाठी अंजली दमानिया यांनी रान उठवले होते. कराड आणि मुंडे यांचे व्यावसायिक संबंधाची कागदपत्रे दमानिया यांनी सादर केली होती. मात्र, त्यानंतरही मुंडे यांचा राजीनामा मान्य झाला. बीड येथील सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडमुळे गोत्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिला आहे. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नगरी पुरवठा विभाग सांभाळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. जेव्हापासून हे प्रकरण गाजत आहे तेव्हापासून धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत.
Comments