नक्षलींचा डोंगर सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड- तेलंगणा सीमेवर करावाई
- Navnath Yewale
- May 2
- 2 min read

छत्तीगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील सुमारे 5,000 फूट उंच असलेल्या अणि नक्षलवाद्यांचा मुख्य तळ मानल्या गेलेल्या कर्रेपट्टा डोंगरावर अखेर सुरक्षादलांनी पुन्हा ताबा मिळवला आहे. नऊ दिवस चाललेल्या कठोर लढ्यानंतर सुरक्षादलांनी हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेत तिरंग फडकवला आहे.
दरम्यान, हा भाग नक्षल नेता हिडमा, देवा, दामेदर आझाद आणि सुजाता यांचा गड मानला जात असे. पंरतु आता या भागावर पुर्णपणे सुरक्षादलांचे नियंत्रण आहे. हे अभियान छत्तीसगडमधील बस्तर परिसरात आजवरचे सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान मानले जात आहे.
या मोहिमेत जिल्हा राखील दल, बस्तर फायटर्स, विशेष कार्यदल, राज्य पोलिस दलाच्या सर्व युनिट्स, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि त्यांचे विशेष कमांडो ‘कोब्रा’ यांनी सहभाग घेतला होता. सुमारे 24000 सुरक्षा कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. कर्रेपट्टा आणि दुर्गमगट्टा या डोंगरांच्या घनदाट जंगलात 800 चौरस किलोमिटरच्या परिसरात 21 एप्रिलपासून हे अभियान सुरू झाले.
हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या साह्याने, सुरक्षादलांनी उंचसखल भागात प्रवेश करत नक्षलवाद्यांना हूसकावून लावले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक जी.पी.सिंग यांनीही बुधवारी मोहिमेच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. हा डोंगर पूर्वी माओवादी‘ जनमुक्ती गुरिल्ला लष्कर’ (पीएलजीए) च्या बटालियन क्रमांक 1 चा मुख्य तळ होता. हे नक्षलवादी या भागातील आदिवासींवर दबाव टाकून सुरक्षित आसरा घेत असत.
आता मात्र सुरक्षादलांनी तो संपूर्ण भाग नक्षलांपासून मुक्त केला आहे. पीएलजीए, तेलंगणा राज्य समिती, दंडकारण्य विशेष झोनल समिती आणि मध्यवर्ती प्रादेशिक समिती या नक्षली संघटनांच्या हालचाली पूर्णपणे बंद पाडणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या ठिकाणी जवळपास 500 नक्षलवादी होते. अशी माहिती सुत्रांनी दिली.
केंद्र सरकारने मार्च 2023 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासबंधी ठोस कार्ययोजना आखली आहे. छत्तीगड सरकारने स्पष्ट केले आहे की, हिंसक मार्ग स्वीकारणार्यांशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. आत्मसमर्पण करणार्यांना शासानाच्या धोरणानुसार मदत आणि पुनर्वसन दिले जाईल, परंतु हिंसेचा मार्ग स्वीकारणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
2024 मध्ये आतपर्यंत 144 नक्षलवादी चकमकीत ठार माण्यात आले असून त्यातील 128 हे बस्तर विभागातील आहेत. मार्च 29 रोजी झालेल्या दोन मोठ्या चकमकांमध्ये 18 नक्षलवादी ठार झाले होते, ज्यात 11 महिला होत्या. 300 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक़ मदत आणि पुनर्वसन सुविधा दिल्या गेल्या अहोत. 2024 मध्ये एकूण 792 नक्षलवाद्यांनी केवळ बस्तर भागात आत्मसमर्पण केले आहे.
Comments