नगद नारायणाच्या भक्तीसागरातून उसळला लाखोंचा जनसमुदाय
- Navnath Yewale
- Apr 17
- 3 min read
नारायण गडाची सर्वजातीधर्माला सोबत घेवून चालण्याची परंपरा- महंत शिवाजी बाबा महाराज
राक्षसभुवन येथे 73 व्या फिरत्या नारळी साप्ताहाची सांगता; ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांचे सेवापर्व, वाखणण्याजोगे नियोजन

मराठवाड्यातील धाकटी पंढरी म्हणून ख्यातील पावलेल्या श्री क्षेत्र नारायण गडाचा 73 व्या फिरत्या नारळी साप्ताहाचा सांगता सोहळा गुरूवार (17 एप्रील) राक्षसभुवन (तांबा), (जि. बीड) येथे संपन्न झाला.राज्यातील ख्यातनाम प्रवचनकार, किर्तणकारांनी सेवा बजावून नगदनारायणाच्या पावन भुमित भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्याचेच फलित गुरूवारी गडाचे मठाधिपती महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या काल्याच्या किर्तणाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत साप्ताहाचा सांगता सोहळा संपन्न झाला.

वारकरी सांप्रदायामध्ये राज्यात धाकली पंढरी म्हणून सर्वश्रुत नारायणगडाच्या फिरत्या नारळी साप्ताहास महत्व प्राप्त आहे. राक्षसभुवन (तांबा) येथे यंदाच्या नारळी साप्ताहाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी गडाचे महंत प्रेममुर्ती शिवाजी बाबा महाराज यांच्या काल्याच्या किर्तणाने साप्ताह सोहळ्याची सांगता झाली.
गडाचे उत्तराधिकारी संभाजी बाबा महाराज, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, माजी आमदार बाळासाहेब आजबे,राष्ट्रवादी (श.प.गट) युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे, धनंजय देशमुख, चंपावती पानसंबळ, कुंडलीक खांडे, नितीन धांडे, विश्वस्त दिलीप गोरे, बळीराम गवते,जे. पी. शेळके, बी.बी. जाधव, किशोर पिंगळे, नारायण परजणे, चंद्रकांत नवले, राजेंद्र मस्के, सतिष शिंदे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, सेवानिवृत्त अभियंता दिगांबर मळेकर आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.

गडाचे मठाधिपी महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (10 एप्रील) साप्ताहास प्रारंभ झाला. नामांकित किर्तणकार, प्रवचनकार यांच्या रसळ वाणीतून भाविकांना भक्ती, ज्ञाण, दया , शांती, करुणाचा उपदेश मिळाला. जिल्ह्यासह राज्यभरातून उपस्थित असलेल्या लाखो भाविकांनी नगदनाराणाच्या या भक्तीमय परवणीचा लाभ घेतला. मठाधिपती महंत शिवाजी बाबा महाराज यांनी “कंठी धरीला कृष्ण मनी कालावाटू एकमेका” हा अभंगावर सेवेचा समारोप केला.
प्रसंगी नारायण गडाची सर्व जाती धर्माला सोबत घेवून चालण्याची कायम परंपरा आहे. नगद नारायणाची सेवा केल्यास आशीर्वाद नक्कीच मिळतो, गेल्या आठ दिवसांपासून राक्षसभुवन (तांबा) ग्रामस्थांनी केलेेले नियोजन आणि कोणत्याही बाबतीत ते मागे न पडल्यामुळे हा साप्ताह न भूतो न भविष्यती झाला आहे. जीवनात साधू संतांच्या तत्वज्ञानाचा अंगिकार करा जीवन सुखकर होईल असा मोलाचा उपदेश त्यांनी दिला. वारकरी सांप्रदायामध्ये जातिभेद नसून सर्व जण एक असल्याचा सिद्धांत आहे. आत्महत्ये सारखं दूसरं पातक नाही, त्यामुळे कोणीही आत्महत्या करु नये. ज्ञाण प्राप्तीसाठी संताची संगत धरा निश्चितच संकटाची लिलया पार झाल्या शिवाय राहणार नाही.
मणुष्य जन्मात आत्म शांतीसाठी निसर्गाचे जतन करा हा उपदेश देत “ मुली वाचवा मुली शिकवा, प्रत्येकाने किमान एक तरी, झाड लावून त्याचे संगोपन करा असा मौलिक संदेश ही महंत शिवाजी बाबा महाराज यांनी दिला. या साप्ताह सोहळ्यास राक्षसभुवन (तांबा), खोलेवाडी, विघनवाडी, पिपळ्याची वाडी, कान्होबाची वाडी, गोमळवाडा, रुपूर, कठाळवाडी, जन्नेवाडी पंचक्रोशीतील गाव, वाडी-वस्त्यांवरील नागरिकांनी डोळ्यात तेल घालून तन-मन, धनाने सेवा बाजावली.
यावेळी श्री क्षेत्र श्रीरामा संस्थान (गोमळवाडा) चे महंत भानुदास महाराज शास्त्री, श्री क्षेत्र ज्ञाणेश्वर महाराज आश्रम दगडवाडीचे महंत नारायण महाराज ढिसले, कानिफनाथ संस्थान कान्होबाचीवाडी श्रीरंग महाराज तळेकर यांच्यासह नारायणगडाचे मृदंगाचार्य,गायणाचार्य, टाळकरी, विणेकरी आदी भक्त मंडळी उपस्थित होती. काल्याच्या महापंगतीने सोहळ्याची सांगता झाली आगामी वर्षीचे नारळ उमापुर (जि.बीड) ग्रामस्थांनी दोन हजार महिला भाविकांच्या कल दिंडने मोठ्या थाटात उचलले.
ग्रामस्थांकडून सर्व सेवेकर्यांचा सन्मान
नारळी साप्ताहामध्ये मंडप, डेकोरेटर्स, आचारी, स्वयंसेवक, शोभेच्या दारुवाले, बँड पथक, टाळकरी, गायणाचार्य, मृदंगाचार्य, वारकर्यांसह सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेत, पुढारी सर्व घटकातील सेवेकर्यांचा व्यासपीठावर शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजन, गांव एकोप्याचे दर्शन
राक्षसभुवन ग्रामस्थ मागील तीन महिन्यापासून या साप्ताहाच्या जय्यत तयारीला लागले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी ‘अतिथी देवो भव’ या ओवीच्या पंक्ती साध्य करण्यासाठी आहोरात्र सेवेत झोकून दिले. महिलांनी नागरिकांचा मुत्सद्दीपणा वाखणण्या जोागा होता. गावातील आठरा पगड जातींसह मुस्लिम, बौद्ध धर्मीयांनी तोडीस तोड भाविकांची सेवा बजावल्याने गाव एकोप्याचे अगळेवेगळे दर्शन झाल्याच्या भावना लाखो भाविकांच्या मुखी होत्या.
Comments