top of page

पहलगामच्या पिडीत कुटूंबीयांना न्याय मिळणारच!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बात मधून अश्वासन





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. आजचा त्यांचा हा 121 वा भाग होता. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देणार असल्याचे ते म्हणाले, तसेच पिडीतांना न्याय देणार असल्याचे म्हटले. माझ्या मनात खूप वेदना होत आहेत. 22 एप्रील रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दु:ख झाले आहे.


दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळत आहे, याची मला कल्पना आहे. काश्मीरमध्ये शांतता परतत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते. लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते. या गोष्टी देशाच्या शत्रुंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना पहावल्या नाहीत. हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍यांची निराशा दर्शवितो. त्यांचा भ्याडपणा दर्शवितो, असे मोदी म्हणाले.


दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकाला काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला होता. परंतू 140 कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. जग आपल्यासोबत आहे. मी पुन्हा एकदा पिडीत कुटुंबांना अश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल न्याय नक्कीच मिळेत. या हल्ल्यातील गुन्हेागरांना आणि कट रचणार्‍यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असे अश्वासन मोदी यांनी दिले.


देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना गमावले आहे. विज्ञाण, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्त्रोला एक नवीन ओळख मिळाली. अंतराळ कार्यक्रमांमुळे भारताच्या प्रयत्नांना जागतिक मान्यता मिळाली. आज भारत वापरत असलेले अनेक उपग्रह डॉ. कस्तुरीरंगन यांच्या देखरेखीखाली प्रक्षेपित करण्यात आले, अशा शब्दांत मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

Comments


bottom of page