पहलगाममध्ये 26 निष्पापांचा बळी घेणार्या क्रूर दहशतवाद्यांचा ठिकाणा सापडला; ‘मिशन 54 साठी भारतीय सैन्य तैनात .
- Navnath Yewale
- May 5
- 2 min read

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांचा ठिकाणा सापडला आहे. मिळालेल्या ठिकाण परिसरात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
जम्मू आणि काश्मीमरमधील पहलगाम येथील बैसरन खोर्यात 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये प्रामुख्याने हिंदू पर्यटकांचा समावेश होता. आता तपास यंतणांना दहशतवाद्याचे ठिकाण बैसरन खोर्यातील जंगलात असल्याचे समजले आहे. या ठिकाणापासून 54 वेगवेगळ्या दिशांना जाणारे मार्ग आहेत, ज्यावर भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
हल्याची घटना
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन खोर्यात, ज्याला, ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते, पाच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. या हल्ल्याचे जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली होती, जी पाकिस्तानस्थित लष्कर- ए- तैयबा या दहशवादी गटाची उपशाखा मानली जाते. मात्र चार दिवसानंतर टीआरएफने आपला दावा मागे घेतला.
भारतीय गुप्चर यंत्रणांनी या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा हात असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हल्ल्याच्या तपासात असे पुरावे मिळाले आहेत, जे पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद आणि कराची येथील सुरक्षित ठिकाणांशी जोडले गेले आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, हल्ल्यात सहभागी असलेला एक दहशतवादी हाशिम मूसा हा पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाचा माजी सदस्य होता जो लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता.
बैसरन खोर्यातील तपास
बैसरन खोरे हे पहलगाम शहरापासून सुमारे 7 किलोमिटर अंतरावर आहे आणि ते केवळ पायी किंवा घोड्यावरुन पोहोचता येते. या खोर्यापासून 54 मार्ग वेगवेगळ्या दिशांना जातात, ज्यामध्ये काही घनदाट जंगल आणि पर्वतांकडे, तर काही खालच्या भागात काश्मीरच्या विविध भागांशी जोडलेले आहेत. सैन्याने या सर्व मार्गांवर शोधमोहिम सुरू केली आहे. तपासादरम्यान, दहशवाद्यांनी हल्ल्यापूर्वी बैसरन खोर्यात दोन दिवस आधिच प्रवेश केला होता. असे समोर आले आहे. त्यांनी 15 एप्रिल रोजी पहलगाममध्ये प्रवेश केला आणि बैसरन, अरु खोरे,बेताब खोरे आणि स्थानिक मनोरंजन उद्यान अशा चार ठिकाणांची पाहणी केली होती. बैसरन खोरे त्यांनी हल्ल्यासाठी निवडले कारण तेथून पलायन करणे सोपे होते.
एनआयएचा तपास आणि अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या हल्ल्याच्या तपाससाठी बैसरन खोर्यात 3डी मॅपिंग केले आहे. स्थानिक छायाचित्रकाराने हल्ल्याचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ आणि एका भारतीय सैन्य अधिकार्याची साक्ष यामुळे तपासाला गती मिळाली आहे. या अधिकार्याने हल्ल्यादरम्यान आपल्या कुटुंबासह 35-40 जणांचे प्राण वाचवले होते. एनआयए ने आतापर्यंत 2500 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यापैकी 186 जणांना चौकशीसाठी तुरुंगात ठेवले आहे. तसेच,80 ओव्हर ग्राऊंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) यांना अटक करण्यात आली आहे. या ओजीडब्ल्यूंनी दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता, असे तपासात समोर आले आहे.
सरकार आणि सैन्याची कारवाई:
हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती, ज्यामध्ये विरोधी पक्षांनी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने बैसरन खोरे पर्यटकांसाठी दोन महिने आधीच उघडल्यामुळ सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली गेली नव्हती, ही चूक मान्य केली आहे. भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये 1960 च्या सिंधू जल कराराची अंमलबजावणी थांबवणे, अटारी येथील एकात्मिक तपासणी चौकी बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे यांचा समावेश आहे.
Comments