top of page

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी चेन्नईमधून या देशात उतरल्याचा संशय शोध मोहिम सुरू; श्रीलंकेत विमानाची कसून तपासणी



पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे. या क्रमाने, भारताकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून विमानाने सहा संशयित श्रीलंकेत पोहोचले आहेत. आज शनिवारी (03 मे 2025) दुपारी कोलंबो विमानतळावर मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात आली.


वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या एअरलाइन्सने सांगितले की, फ्लाइट क्रमांक यूएल 112 सकाळी 11:59 वाजता बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू करण्यात आली. ीारतीय अधिकार्‍यांनी श्रीलंकेला इशारा दिला होता की, विमानात पहलगामचे सहा संशयित होते. संशयित श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानाने कोलंबोला पोहोचले असावेत असे मानले जाते.


स्थानिक वृत्तानुसार, श्रीलंका पोलीस, श्रीलंका हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा युनिट्सने संयुक्तपणे शोध मोहीम राबवली.पण कोणताही संशयित सापडला नाही. चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरकडून अलर्ट मिळाल्याचे एअरलाईनने म्हटले आहे. श्रीलंकेचया एअरलाइन्सने सांगितले की, कोलंबोमध्ये आगमन झाल्यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.


देशातील प्रमुख दहशतवाद विरोधी संस्था असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तात्काळ कारवाई केली अणि सिंधू पाणी करार स्थगित केला. याशिवाय पाकिस्तानातून येणार्‍या आयात आणि पार्सलवरही बंद घालण्यात आली आहे.


पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाही रद्द केले आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. ज्यामध्ये शिमला कराराचाही समावेश आहे.

Comments


bottom of page