“ पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींना आधीच माहिती होती...”मल्लिकार्जुन खङगे यांचा पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप
- Navnath Yewale
- May 6
- 2 min read

पहलगाम हल्ल्यानंतर देशात राजकीय वक्तृत्वाची लाट सुरू झाली आणि ती थांबण्याचे काही नाव घेत नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सतत एकमेकांना टोमणे मारत आहेत आणि आरोप- प्रत्यारोप करत आहेत. या हल्ल्याबाबत काँग्रेस भाजपवर सतत हल्ला करत आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन ख़डगे यांनी सरकारवर गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा आरोप केला आहे. आणि पाकिस्तानविरुद्ध कारवाईला पाठिंबा व्यक्त केला आहे.
मल्लिकार्जुन खडगे यांचे आरोप:
एएनआयशी बोलतना खडगे म्हणाले की, “ ही गुप्तचर यंत्रणेची चूक आहे, जी सरकारने स्वत: मान्य केली आहे आणि ती दुरुस्त करण्याचे म्हटले आहे. जेव्हा त्यांच्याकडे आधीच माहिती होती, तेव्हा काहीही का केले गेले नाही? मला माहिती मिळाली आहे की, तीन दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता. आणि म्हणून त्यांनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला. मी हे एका वर्तमाणपत्रातही वाचले होते” त्यांनी पुढे प्रश्न केला की, “ जर सरकारला हल्ला होऊ शकतो, अशी अधीच माहिती होती, तर पलगाममध्ये सुरक्षा दलांची संख्या का वाढवली गेली नाही? त्या निष्पाप
नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारने घेऊ नये का?”
भाजपचा पलटवार : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या या विधानावरून भाजपने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते सीआर केशवन यांनी खडगे यांची तुलना ‘ अधुनिक काळातील मीर जाफर ’ शी केली आणि त्यांच्या विधानाला‘ देशाचा विश्वासघात’ म्हटले. केशव म्हणाले की, “ खरगे यांनी केलेले विधान पूर्णपणे खोटे, निराधार आणि विषारी आहे. हा केवळ पंतप्रधानांवरच नाही तर संपूर्ण देशाच्या सुरक्षा संस्थांवर हल्ला आहे. त्यांचे वक्तव्य निंदनीय, अक्षम्य आणि अस्वीकार्य आहे. ” भाजप प्रवक्ते पुढे बोलताना म्हणाले की, जर काँग्रेस अध्यक्षांकडे पंतप्रधानांविरुद्धच्या दाव्यांचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे सार्वजनिकरित्या सादर करावेत, अन्यथा त्यांनी बिनशर्त माफी मागावी.
गुप्तचर संस्थांनी दिला होता आधीच इशारा: काही दिवसापूर्वी उघड झाले होते की, गुप्तचर विभाग (आयबी) आणि इतर सुरक्षा एजन्सींनी जम्मू आणि काश्मीरमधील सार्वजनिक स्थानिक सुरक्षा अधकिार्यांना पर्यटकांना लक्ष केले जाण्याची शक्यता असल्याबद्दल सतर्क केले होते. हा इशारा पंतप्रधान मोदींच्या 19 एप्रिल रोजी होणार्या प्रस्तावित भेटीसाठी आणि श्रीनगर प्रदेशासाठी होता. पण खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. नंतर, श्रीनगरपासून सुमारे 90 किलोमिटर अंतरावर असलेल्या पहलगाममध्ये हल्ला झाला. पलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक राजनैतिक आणि आर्थिक पावले उचचली आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तानामधील पाण्याच्या वाटपोचे नियम करणारा सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतावर हल्ला करणार्यांना योग्य उत्तर देणे हे माझे कर्तव्य आहे.
Comentários