top of page

पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार; 10 भारतीय नगारिकांचा मृत्यू , 48 जण जखमी !



पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून वेळीच प्रत्युत्तर देण्यात यावे अशा संतप्त भावना व्यक्त होत होत्या. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतच्या सर्व व्यवहारावर निर्बंध लादले शिवाय सिंधू जल करारही रद्द ची घोषणा केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा अल्टीमेटम दिला. त्यामुळे पहलगाम हल्ल्याचा भारत कठोर बदला घेणार यात शंकाच नव्हती अखेर 6 व 7 मे च्या मध्यरात्री ‘ ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एअर स्ट्राईक करत मोहिम फत्ते केली. या हल्ल्यात पाकिस्तानातील दहशवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त करण्यात आले. यानंतर पाकिस्तानने एलओसी (लाईन ऑफ कन्ट्रोल) वर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरवात केली आहे. या हल्ल्यात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर 48 जखमी झाल्याची माहिती आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली.


दरम्यान, 22 एप्रिलला जम्मु-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत त्यांच्या कुटूंबासमोरच त्यांना गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात 25 भारतीय पर्यटक व 1 नेपाळी पर्यटकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त करण्यात आले. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानकडून पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जम्मू -काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. संवेदनशील भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. लोकांना आवश्यक सुविधा पुरवण्याची व्यवस्था करण्याचंही त्यांनी सांगितलं. मनोज सिन्हा यांनी सोशल मिडिया एक्स वर पोस्ट करून माहिती दिली की, त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि त्यांच्यासाठी अन्न, निवारा, वैद्यकिय सुविधा आणि वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.


सशस्त्र दलांवर गर्व आहे: अमित शाह म्हणाले की, “ आम्ही सशस्त्र दलांवर गर्व करतो. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये झालेल्या निर्दोष लोकांच्या हत्येचं उत्तर आहे. मोदी सरकार भारत आणि येथील नागरिकांवर होणार्‍या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. भारत दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.


Kommentare


bottom of page