पाकिस्तान पुन्हा करणार ‘मुंबई हल्ला’?
- Navnath Yewale
- May 7
- 1 min read

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई केली आहे. माहितीनुसार, या कारवाईत शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. आता पाकिस्तानी सैन्य सामान्य लोकांना लक्ष्य करत आहे. त्याच वेळी, भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे.
पाकिस्तान मुंबईवर क्षेपणास्त्र हल्ला करणार?
ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानची निराशा स्पष्टपणे दिसून येते. परंतु ते भारताची आर्थिक राजधानी मुंबईला लक्ष्य करू शकते का? पाकिस्तानी सैन्याकडे मुंबईवर थेट हल्ला करण्याची ताकद आहे का? की तो सायबर हल्ला, ड्रोन हल्ला किंवा क्षेपणास्त्र प्रक्षेपण अशा इतर मार्गांनी मुंबईला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल? अफवांपासून दूर राहून सत्य समजावे म्हणून प्रत्येक नागरिकाला या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पाकिस्तानचे पुढचे लक्ष्य “मुंबई”?
खरंतर, पाकिस्तानकडे अशी क्षेपणास्त्र आहेत, जी लांब अंतरावर हल्ला करू शकतात आणि मुंबईपर्यंतही पोहोचू शकतात. पण आता भारत पूर्वीसारखा राहिलेला नाही. एस 400 हवाई संरक्षण प्रणाली आणि ‘आकाश’ सारख्या स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आता पूर्णपणे सक्रिय आहेत.ज्यामध्ये शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र किंवा हवाई हल्ला हवेतच नष्ट करण्याची क्षमता आहे.
मुुंबईवर हल्ला झाला तर काय होणार?
दुसरीकडे, पाकिस्तानला हे देखील माहित आहे क, जर त्याने मुंबईसारख्या मोठ्या शहरावर थेट हल्ला केला तर भारत त्याला अजिबात सोडणार नाही. अशा कोणत्याही कृतीचा अर्थ थेट युद्ध आणि कदाचित अणुयुद्ध होईल आणि जर असे झाले तर त्याचा परिणाम केवळ भारत आणि पाकिस्तानपुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. यामुळेच संयुक्त राष्ट्र (यूएन), अमेरिका,चीन आणि इतर मोठे देश अशा परिस्थितीचे युद्धात रुपांतर होण्यापूर्वीच ती थांबवण्यासाठी सक्रिय होतात. या टप्यावर, ‘ कूटनिती’ हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र बनते.
Comments