top of page

बाबासाहेब गुरु कोणाला माणतात




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही, तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तव्य गाजवले.

यामुळे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. त्यांनीच दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, ‘आधुनिक भारताचे निर्माते’ त्यांना म्हटले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणाला म्हणतात गुरु

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानणारे कोट्यावधी लोक आहेत. परंतु स्वत: डॉ. बााबासाहेब आंबेडकर कोणाला आपले गुरू मानता? त्या बाबतचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात आहे. ‘माझी आत्मकथा’ या आत्मचरित्रात त्यांनी आपण कोणामुळे घडलो ते स्पष्टपणे मांडले आहे. आपल्या जीवनास कोणामुळे दृष्टी मिळाली अन आपले गुरू कोण आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. त्यांनी बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना आपले गुरु म्हटले आहे. यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.



पहिले शिक्षक बुद्ध

बाबासाहेबांनी आपल्या जीवनात क्रांती आणण्याचे श्रेय पहिले गुरु गौतम बुद्ध यांना दिले आहे. कृष्णाजी अर्जुन केळुसकर म्हणजेच दादा केळुसकर यांनी गौतम बुद्धांवर चरित्र लिहिले होते. त्यांनी एका समारंभात गौतम बुद्धांचे हे चरित्र बाबासाहेबांना भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून आपण भारवलो. बुद्ध चरित्र वाचल्यानंतर आपला रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथावरील विश्वास उडाला. मी गौतम बुद्ध यांचा अनुयायी झालो, असे बाबाहेबांनी म्हटले.



दुसरे गुरु कबीर

बाबासाहेब म्हणतात, माझे दुसरे गुरु संत कबीर आहेत. त्यांच्यात किंचतही भेदभाव नव्हता. ते खर्‍या अर्थाने महात्मा होते. मी गांधींना मिस्टर गांधी म्हणतो. त्यामुळे मला पत्रे येतात. ज्यामध्ये अशी विनंती आहे की मी गांधीजींना फक्त महात्मा गांधी म्हणून बोलावे. पण मी त्याच्या विनंतीला महत्व दिले नाही. मला संत कबीरांची शिकवण या लोकांसमोर मांडायची आहे.

तिसरे गुरु महात्मा फुले

बाबासाहेब आपले तिसरे गुरु महात्मा ज्योतीबा फुले आहेत, असे सांगतात ते म्हणतात मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या देशात पहिली मुलींची शाळा उघडली गेली. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्यातिबा फुले यांच्या शिकवणींनी माझे जीवन घडवले आहे. असे बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

Comments


bottom of page