top of page

बिहारच्या निवडणूकीदरम्यान दहशवादी तहव्वूर राणाला फाशी - संजय राऊत


ree



शिवसेना नेते संजय राऊत यांनी तहव्वूर राणा याच्या फाशीसंबंधी मोठ—— वक्तव्य केले आहे. त्यांनी ही फाशी बिहार विधानसभा निवडणूकीदरम्यान ेदण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यावेहभ या गोष्टीचे भांडवल न करण्याचा टोला लगावला आहे.


26/11 मुंबई हल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वूर हुसैंन राणा याला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकउे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणाला ऐन बिहार विधानसभा निवडणूकीच्या काळात फासी देण्यात येणार असल्याचा दावा करुन खळबळ उडवून दिली आहे.


देशातील बँकांना गंडा घालणार्‍या नीरव मोदी आणि मेहूल चौंकसी यांचे लवकर प्रत्यार्पण करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. त्यांनी माजी नौंदल अधिकारी आणि भारतीय व्यापारी कुलभूषण जाधव यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली.


राणाला फाशी द्या

दहशतवादी तहव्वूर राणा याला लागलीच फाशी दिली पाहिजे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. पण त्याला बिहार विधानसभा निवडणूकीच्या काळात फाशी देण्यात येईल असेही ते म्हणाले. बिहार निवडणूका या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. राणाला भारतात आणण्यासाठी 16 वर्षापासून लढा सुरू आहे.



काँग्रेसच्या शासन काळात ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे राणा याला भारतात आणण्याचे श्रेय कोणीही घेऊ नये असे राऊत म्हणाले. तहव्वूर राणा हा प्रत्यार्पण होणारा काही पहिला नाही, यापूर्वी1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याला सुद्धा प्रत्यार्पण प्रक्रियेतंर्गत भारतात आणण्यात आले होते.


कुलभूषण जागधव यांना परत आणा


कुभूषण जाधव यांना भारतात परत आणावे अशी मागणी त्यांनी 2016 मध्ये त्यांना धोक्याने पकडून पाकिस्तानात आणण्यात आले होते. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा कथित आरोप करत पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितलेली आहे.


कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणले होते. यामागे पाकिस्तानचे भारताला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र होते. आता जाधव यांना भारतात परत आणण्यासाची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी राणाला परत आणण्यात कोणीही राजकारण करून त्याचे श्रेय लाटू नये असा टाले लगावला.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page