बीडमध्ये पुन्हा हत्याकांड! बिलावरुन वाद ; धारदार शस्त्राने सपासप वार करुन हॉटेल मालकाचा खून
- Navnath Yewale
- Apr 21
- 2 min read

बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बिल देण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून धारदार शस्त्राने सपासप वार करत हॉटेल मालकाचा खून करण्यात आला आहे. माजलगाव येथे ही घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बीड जिल्ह्यात खूनाची ही पाची घटना आहे.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी संपायचं काही नाव घेत नसताना माजलगाव शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी भाजपच्या पदाधिकार्याची भरदिवसा निर्घुन हत्या, नंतर चिकन विक्रिच्या किरकोळ वादातून आल्पवयीन मुलाची हत्या तर आता बिल देण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे. महादेव गायकवाड (वय 54 वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव पुन्हा एकदा निर्घुण हत्येच्या घटनेने हादरले आहे. हॉटेल (ढाबा) मालक व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (20 एप्रील) रा़त्री उघडकीस आली.
यात गंभीर जखमी असलेल्या बाप- लेकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.
माजलगाव शहरापासून 4 किलोमिटर अंतरावर नागडगाव पाटी कॉर्नरवरील गावरान ढाबा मालक महादेव गयाकवाड यांची एका टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. महादेव गायकवाड (रा. मंजरथरोड, माजलगाव) हे रविवारी आनंदगाव येथील एका टोळकयाने बिल देण्यावरुन महादेव गायकवाड यांच्याशी वाद घातला. वाद वाढला असता टोळक्याने महादेव गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. टोळक्याने महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष याच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला.
उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली ..
दोघांना गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, महादेव गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.दुसरीकडे आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
या प्रकरणावर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये सहा आरोपींच्या विरोधता कल 302 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, वारंवार घडणार्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळेच महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींना तात्काळ अडक करा, अशी मागीणी जोर धर आहे.
Comments