top of page

बीड पुन्हा हादरलं : रिंगण करुन रबरी पाईप, लाठ्या-काठ्यांचा वापर; ‘रक्त सांगळलं, बेशुद्ध होईपर्यंत’ महिला वकिलास मारहाण

बीडच्या आंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला वकिलास गावातीलच सरपंच महिलेच्या दहा कार्यकर्त्यांनी रिंगण करुन बेशुद्ध हाईपर्यंत मारहाण केली. शिवाय एका रात्रीत उपचार घेवून तीला घरी पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली असून राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.





सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं बीड आधिच चर्चेत आहे. त्यात रोज नवनविन प्रकरणांची भर पडत आहे. त्यातच आता आणखीन नवा अमानुष महारहाणीचा प्रकार समोर आला आहे. लाऊडस्पीकरमुळं आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार एका वकिल महिलेनं केली. त्याचा राग मनात धरुन तिला गावातील सरपंचासह दहा पुरुषांनी लाठ्या-काठ्यांसह जेसीबी पाईपने बेदम मारहाण केली आहे.


यामध्ये महिलेचं शरीर काळं-निळं पडलं असून शरिरावर जागोजाग रक्त सांगळलेल्या व्रणाचे फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं आहे. मारहाण करणारा सरपंच कोण आहे? त्याची एवढी हिंमत कशी वाढली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


बीडच्या आंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी आंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणार्‍या महिलेला किरकोळ कारणावरुन अमानुष मारहाण केली आहे. महिला सरंपच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करुन काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहान केली. एवढी जबर मारहाण केली की वकिल महिलेच्या हाता-पायावर पाठीवरील अक्षरश: रक्त गाठाळलेले व्रण पडले आहेत.


पिडीत महिला वकिलाने गावातील ध्वनी प्रदूषणांमुळ मायग्रेनचा त्रास होत असल्यामुळे आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावून नयेत, तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात या बाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. त्याचाच राग मनात धरुन ही मारहाण करण्यात आली आहे. सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकिल महिलेला मारहान केल्यानं या प्रकरणी आरोपींवर कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी होत आहे.


या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणार्‍या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करुन काठ्या आणि जेसीबी पाईपनं जबर माहरहाण करण्यात आली. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दावाखान्यातून एका रत्रीत उपचार करुन घरी पाठवलं आहे.


सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकिल असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवाल आव्हाड यांनी बीडचे पोलिस अधिक्षक आणि बीड वकिल संघाला केला आहे.

Comments


bottom of page