top of page

भाजपाचे संकटमोचन ‘दादा’ वर गरजले; राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर मायुतीत मिठाचा खडा?



मुंबईत शनिवारी दोन माजी मंत्री, चार माजी आमदारांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. त्यातच आता महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीच्या विविध पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्याने सतधारी पक्षात प्रवेश घेत आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्याा पार्श्वभुमीवर शनिवारी दोन माजी मंत्री, चार माजी आमदारांसह शेकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पण या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सतीष पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचं (अजित पवार गट) घड्याळ हाती बांधलं आहे. या पक्षप्रवेशावर भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे. विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन अजित पवारांनी प्रोटोकॉलचा भंग केल्याची टिका गिरीश महाजन यांनी केली आहे.


जळगाव जिल्ह्यातील 4 आणि धुळे जिल्ह्यातील एका माजी आमदाराचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याच्या पार्श्वभूमिवर मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. जे आमच्या विरोधात लढले आहेत, त्या मविआमधील कोणालाही प्रवेश देताना प्रोटोकॉल ठरला होता. पण तो पाळला गेलेला नाही. याबाबतीत आम्ही वरिष्ठांशी बोलू, असंही मंत्री महाजन यांनी म्हणाले.

आता आम्हाला कोणालाही पक्षात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपात त्यांना आम्ही प्रवेश दिला तर अजित पवार यांनी काही बोलायला नको. असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार गटातील पक्षप्रवेशावरुन नाराजी व्यक्त केली.


या पक्षप्रवेशावर शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आक्षेप घेतला आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेना शिंदे गटाची अडचण निर्माण करण्याच प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केले आहे. ज्यांच्या छाताडावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला आहे. त्यांना पक्षात घेताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकनाथ शिंदे यांना विचारात घेणे अपेक्षीत होते असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. एकूणच अजित पवार गटात झालेल्या पक्षप्रवेशामुळे महायुतीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे.

Comments


bottom of page