भारताकडून पाकिस्तानची चोहोबाजूने नाकाबंदी
- Navnath Yewale
- Apr 25
- 3 min read
पहलगाम दहशवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर; भारताचे सात महत्वपूर्ण निर्णय

जम्मु- काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा देशभरात संताप तिव्र निषेध करण्यात येत असून नागरिकांतून संताप व्यक्त करण्यत येत आहे. भारत सरकारने पाकिस्तानला चोहो बाजूने घेरण्यास सुरवात केली आहे. भारताच्या कारवायाने पाकिस्तान पुरता भेदरला आहे. पहलगाम हल्ल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (सीसीएस) च्या बैठकीमध्ये सिधू पाणी करार रद्द करण्यासह पाकिस्तानी नागरिकांचा व्हीसार रद्द केला भारतातील पाकिस्ताणी नागरिकांना देश सोडण्याचे सक्त आदेश जारी केले. त्याच बरोबर पाकिस्तानी नागरिकांना आता भारताचा व्हिसा नाकारला. दूसरीकडे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्थल, वायू आणि नौदलास अलर्ट केले आहे.
पहलगामधील दशहवादी हल्ल्याचे पाकिस्तानला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताने आतापर्यंत सात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, भारत पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रत्येक दहशवाद्याला आणि पृथ्वीच्या कोणत्याही कोपर्यातील त्यांच्या मालकांना शोधून काढेल आणि शिक्षा करेल.
12 एप्रील 2025 रोजी झालेल्या या हल्ल्याच्या दुसर्या दिवशी, 23 एप्रील रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने पाकिस्तानविरुद्ध पाच प्रमुख प्रत्युत्तरात्मक पावले उचलली. गुरुवार 24 एप्रील रोजी भारताने आणखी दोन महत्वाचे निर्णय घेतले. भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणते सात मोठे निर्णय घेतले.
सिंधू पाणी करार रद्द
भारताने 23 एप्रील रोजी पाकिस्तानविरुद्ध अनेक कारवाईची घोषणा केली. ज्यामध्ये सिंधू जल करार निलंबित करण्याचा समावेश होता. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 1960 पासून भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे वितरण आणि वापर नियंत्रित केला आहे. सिंधू नदी प्रणालीमध्ये मुख्य नदी, सिंधू आणि तिच्या उपनद्या यांचा समावेश आहे. रावी, बियास, सतलज, झेलम आणि चिनाब या तिच्या डाव्या तीराच्या उपनद्या आहेत, तर काबूल नदी ही तिची उजव्या तीराची उपनद्या आहेत. जे भारतीय हद्दीतून वाहत नाहीत.
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश
24 एप्रील रोजी, भारत सकरकाने पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ प्रभावाने व्हिसा सेवा स्थगित करण्याचा आदेश जारी केला. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा 27 एप्रील 2025 पासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकिय व्हिसा देखील 29 एप्रील 2025 पर्यंतच वैध असतील. अशा परिस्थितीत, सर्व पाकिस्तानी नागरिकांनी सुधारित व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी भारत सोडावा.
संरक्षण/ लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागार अनपेक्षित करार
भारताने 23 एप्रील रोजी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/ लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा म्हणून घोषित केल्याची घोषणा केला. या लोकांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. एवढेच नाही तर भारत इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांनाही परत बोलावत आहे. आतापासून, दोन्ही उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील.
उच्चायुक्तालयांमधील कर्मचार्यांची संख्या कमी
भारत सरकारने 23 एप्रील रोजी घोषणा केली की उच्चायुक्तालयांमधील कर्मचार्यांची संख्या हळूहळू 55 वरुन 30 पर्यंत कमी केली जाईल. हा निर्णय 1 मे 2025 पासून लागू होईल. त्याच वेळी, या लष्करी सल्लागारांचे 5 सहाय्यक कर्मचारी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथील दोन्ही उच्चायुक्तालयांमधून मागे घेतले जातील.
अटारी एकात्मिक तपासणी नाका बंद
भारताने 23 एप्रील रोजी अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही दशांमधील ही एकमेव कार्यरत जमीन सीमा कॉ्रसिंग आहे. अटारी येथील एकात्मिक चेकपोस्ट बंद केल्याने, भारताने म्हटले आहे की ज्यांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली होती ते 1 मे 2025 पूर्वी या मार्गाने परत येऊ शकतात.
रिट्रीट समारंभ सीमेवर मार्यादा
सीमा सुरक्षा दलाने 24 एप्रील रोजी सांगितले की, त्यांनी पंजाबमधील भारत- पाकिस्तान सीमेवरील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे आयोजित रिट्रीट समारंभ “ लहान” केला आहे. 1959 पासून आयोजित करण्यात येणार्या ध्वजारोहण आणि रिट्रीट समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक, आणि स्थानिक लोक अटारी-वाघा सीमेवर गर्दी करतात.
Comments