भारताकडून पाकिस्तानला हल्ल्याची धास्ती; एलओसी पासून शेकडो किमीवर सॉयरन
- Navnath Yewale
- May 2
- 1 min read

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक मंत्री करत आहेत. त्यात पाकिस्तानने भारताची धास्ती घेतल्याचं दिसून येते. भारत कधीही पाकवर हल्ला करू शकते या पार्श्वभूमीवर एलओसी पासून कित्येक किम दूर असलेल्या पाकच्या खैबर पख्तूनख्वा भागात सरकारने 29 जिल्ह्यात सायरन प्रणाली लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्यात पेशावर, एबाटाबाद यांचाही समावेश आहे.
खैबर पख्तूनख्वा सरकारच्या नागरिक सुरक्षा विभागाकडून सर्व आयुक्त, संरक्षण अधिकारी यांना निर्देश देत आपल्कालीन इशारा देण्यासाठी तातडीने सॉयरन लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार , पेशावर, एबाटाबाद, मार्दान, कोहाट, स्वात, डेरा इस्माईल खान आणि बन्नूसारख्या मोठ्या शहरात 4-4 सायरन लावले जात आहेत. त्याशिवाय इतर 22 जिल्ह्यात एक सायरन लावला जात आहे. ज्यात लोअर दिर, चितराल, कुर्रम, नौशेरा, हरिपूर, बाजौर, हंगू, वज्रिरिस्तान, ओरकजई या भागाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे हे सर्व जिल्हे एलओसी पासून खूप अंतरावर आहेत. काही जिल्हे तर 300 ते 500 किलोमिटर दूर आहेत तरीही तिथे सायरन लावले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानला ही भीती कायम आहे की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात उत्तर देण्यासाठी भारत सैन्य कारवाई करू शेकते. दरम्यान, पाकिस्तानच्या बाजौर परिसरता एअर सायरन लावण्याचे फोटो समोर आले आहेत.
पाकिस्तान एलओसी पासून अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या परिसरातही सायरन लावत आहे. भातर काश्मीरमधून नव्हे तर अफगाणिस्तानच्या दिशेने पाकिस्तानवर हल्ला करू शकते अशीही शक्यता पाकिस्तानला वाटते. पाकिस्तानी सैन्याकडून सराव सुरू असून लष्करप्रमुख मुनीर जवानांना धीर देताना दिसत आहेत.
Comments