top of page

भारतात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू, सक्रिय प्रकरणे 1083 वर पोहोचली!




कारोना व्हायरसने पुन्हा एकदा देशात शिरकाव केला आहे. हे आकडे लहान असू शकतात. परंतु ज्या वेगाने ते उदयास येत आहेत त्यावरुन हे स्पष्ट होते की अजूनही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.त्याच वेळी, सक्रिय प्रकरणे 1083 वर पोहोचली आहेत. विशेष म्हणजे कोविड प्रकरणांमध्ये केरळ पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आहे. जिथे 430 सक्रिय प्रकरणे आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र 208, कर्नाटक 80 आणि दिल्ली 104 सारखी राज्ये आहेत. त्याच वेळी, उत्तर प्रदेशात प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे. येथे आतापर्यंत एकूण 30 सक्रिय प्रकरणे आहेत.


मृतांची संख्या 12 वर पोहोचली, महाराष्ट्र सर्वाधिक :

आतापर्यंत कोरोनामुळे 12 मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यापैकी 5 मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. याशिवाय राजस्था, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमधूनही मृत्यूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू ही राज्यातील नवीन लाटेची पहिली पुष्टी होती.


बिहारमध्ये संसर्ग वेगाने पसरतोय:

पाटणा येथे गेल्या 24 तासांत 6 जण पॉझिटिव्ह आढळले, ज्यात एक महिला डॉक्टर आणि दोन परिचारिकांचा समावेश आहे. सर्वांना सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे होती. यापैकी 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उर्व लोक घरीच आयसोलेशनमध्ये आहेत.


दिल्ली सरकारचा दावा; परिस्थिती नियंत्रणात आहे:

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, ‘ कोविड आता धोका राहिलेला नाही, तो एका सामान्य विषाणू संसर्गासारखा आहे. घाबरण्याची गरज नाही, फक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रुग्णालयांत ऑक्सीजन, बेड आणि औषधे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


कोरोनाचे 4 नवीन प्रकार समोर:

आयसीएमआरच्या मते भारतात एलएफ 7, एक्सएफजी,जे एन.1 आणि एनबी.1.8.1 प्रकार सक्रिय आहेत. यापैकी जेएन .1 हा सर्वात जास्त पसरणारा प्रकार आहे, जो रोगप्रतिकारक शक्तीला चुकवून संक्रमित कराते.


जेएन.1 प्रकारची वैशिष्ये :

डोकेदुखी, कोरडा खोकला, सौम्य ताप, घसा खवखवणे, शरीर दुखणे, कधीकधी अतिसार किंवा उलट्या होणे

जरी हे आकडे कमी वाटत असले तरी, तरीही सावधगिरी आणि दक्षता बाळगण्याची गरज आहे. जेएन.1 सारखे प्रकार प्राणघातक नसतील, परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांसाठी समस्या निर्माण करू कशतात. अशा परिस्थितीत गदी टाळणे, मास्क घालणे आणि लक्षणे अढळल्यास त्वरित चाचणी घेणे महत्वाचे आहे.

Comments


bottom of page