भारत दहशतवादाविरोधात ‘कठोर आणि निर्णायक’ कामगिरी करणार; पंतप्रधान मोदी
- Navnath Yewale
- May 4
- 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादला मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगत त्याच्याशी लढण्यासाठी भारताची वचनबद्धता प्रतिपादन केली. पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हेे विधान केले आहे. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्विस लॉरेन्को यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदींनी हे वक्तव्य केले, ज्या दरम्यान अंगोलाला 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा संरक्षण पतपुरवठा जाहीर करण्यात आला.
भारताने पाकिस्तानविरुद्ध नवीन दंडात्मक उपायोजना लागू केल्या आहेत. ज्यामध्ये आयातीवर पूर्ण बंदी घालणे, टपाल सेवा निलंबित करणे आणि पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालणे आदी समाविष्ट आहे. “ आम्ही दोघेही सहमत आहोत की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे” असे मोदी म्हणाले. सीमीपार दहशतवादाचा सामना करण्यासाठी अंगोलाच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली.
पोर्तृगीज भाषेत बोलताना राष्ट्राध्यक्ष लॉरेन्को यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि तणाव कमी करण्याचे अवाहन केले. त्यांनी या घटनेला अंगोलाने दिलेल्या तात्काळ प्रतिसादावर प्रकाश टाकला आणि भारतासोबत असलेल्या एकतेचा पुरुच्चार केला. आफ्रिकन युनियनचे सध्याचे अध्यक्ष म्हणून, अंगोलाची भूमिका विशेष महत्वाची आहे.
प्राप्त माहितनुसार, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील आर्थिक संबंध सचिव दम्मू रवी यांनी लॉरेन्को यांनी हल्ल्याच्या निषेधाकडे लक्ष वेधले. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, जागतिक समुदायाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. आणि भारतासोबत एकता व्यक्त केली आहे. मोदी आणि लॉरेन्को यांच्यातील चर्चेनंतर, भारत आणि अंगोला यांनी आयुर्वेद शेती आणि संस्कृतीमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी तीन करारांवर स्वाक्षरी केली. लॉरेन्को यांच्या दिल्ली भेटीत उर्जा भागिदारीचा विस्तार आणि भारतीय मदतीने अंगोलाच्या संरक्षण दलांचे आधुनिकीकरण करण्यावर चर्चा झाली.
Comentarios