top of page

भारत- पकिस्तान शस्त्रसंधीनंतर 41 दिवसानंतर ट्रम्प यांचा खुलासा; युद्ध थांबवल्याचे क्रेडिट का घेतले.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की त्यांनी शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळावा. त्यांचा दावा आहे की त्यांनी जगभरात अनेक ठिकाणी सुरू असलेले युद्ध थांबवले असूनत ते या पुरस्कारास पात्र आहेत. यासाठी त्यांनी भारत आणि पाकिस्तानचा विशेषत: उल्लेख केला आहे.


राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवूनही त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानासोबतच्या शस्त्रसंधीत अमेरिकेच्या मध्यस्थिचा इन्कार केला आहे.

ट्रम्प यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, भारत - पाकिस्तानमधील युद्ध थांबवूनही मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही. मी कितीही काही केलं, तरीही मला नोबेल मिळणार नाही. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सहा वेळा नोबेल शांतता पुरस्काराचा उल्लेख केला.


यामध्ये त्यांनी भारत- पाकिस्तानमधील यद्ध थांबवण्यासोबतच रवांडा आणि काँगो यांच्यातील शांतता, सर्बिया आणि कोसोव्होमधील शस्त्रसंधी, इजिप्त आणि इथिओपियामधील शांतता, मिडल ईस्ट, रशिया- युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल- इराण संघर्षाचा उल्लेख करत शांततेच्या नोबेल पुरस्काराची गोष्ट मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या सर्व प्रयत्नानंतरही मला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही. हे लक्षता घेतलं पाहिजे की भारत सरकाने अनेक वेळा स्पष्टपणे सांगितले आहे की अमेरिकेच्या हस्तक्षेपाशिवाय आणि मध्यस्थिशिवाय पाकिस्तानसोबतची शस्त्रसंधी ही त्यांच्या विनंतीवर करण्यात आली होती.

मला अत्यंत आनंदाने सांगावे वटते की, मी आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मिळून काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि रवांडा प्रजासत्ताक यांच्यातील युद्धावर एक अत्यंत उत्तम तह घडवून आणला आहे. हे युद्ध विशेषत: हिंसाचार आणि मृत्यूंसाठी कुप्रसिद्ध होते आणि अनेक दशकांपासून चालू होते. रवांडा आणि काँगोचे प्रतिनिधी सोमवारी वॉशिंग्टनला दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी येणार आहेत. हा आफ्रिकेसाठी एक महान दिवस आहे आणि खरं सांगायचं तर, संपूर्ण जगासाठीही एक महान दिवस आहे!


मला या कामासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याबद्दलही नाही, सर्बिया आणि कोसोव्हो यांच्यातील संघर्ष संपविल्याबद्दलही नाही, इजिप्त आणि इथिओपिया यांच्यात शांतता राखल्याबद्दलही नाही.


(एक प्रचंड धरण इथिआपियाने बांधले, जे अमेरिकेने मुर्खपणे आर्थिक मतद देऊन उभारले, त्यामुळे नाईल नदीतून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.)

Comments


bottom of page