मंत्रिमंडळबैठकीच्या दिवसीच आठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या
- Navnath Yewale
- Oct 7
- 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील आठ बड्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
मुरुगनंथम एम. यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड येथे बदली करण्यात आली आहे तर श्रीमती मित्रू पी. एम यांची बदली गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
श्री. नितीन पाटील आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
श्री. ए.बी.धुळज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
श्री. लहू माळी व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
श्री. बाबासाहेब बेलदार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. आदित्य जीवने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. आदित्य जीवने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. मिन्नू पी.एम. सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती मानसी सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



Comments