मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- Apr 19
- 2 min read
श्री क्षेेत्र गहिणीनाथ गडाचा 93 वा फिरता नारळी सप्ताहाचा सांगता सोहळा मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव (घाटशिळ) (जि. बीड) येथे संपन्न झाला.

अलिकडच्या काळात बीड जिल्ह्यातील वाईट गोष्टी मिडियावर दाखवण्यात येतात, पण नारळी सप्ताहाची परंपराही याच जिल्ह्याला लाभलेली आहे. गहिनिनाथ गडाला दत्तक घेण्याची माझी ऐपत नाही, पण मला गडाने दत्तक घ्यावं, गोदावरी खोर्याचं समुद्रात वाहून जाणारं मराठवाड्याच्या हक्काचं 53 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,त्यामुळे मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री क्षेत्र गहिणीनाथ गडाच्या 93 व्या नारळी सप्ताहाचा सांगता सोहळा पारगाव (घाटशीळ) येथे शनिवारी (19 एप्रील) संपन्न झाला. गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षिरसागर, भिमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, वक्तबोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, लक्ष्मण हाके, प्रतापराव ढाकणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आदींची उपस्थिती होती.
श्री क्षेत्र गहिणीनाथ गड (चिंचोली) येथील फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास राज्याच्या काणाकोपर्यातून लाखो भाविकांची उपस्थिती होती. हर्षउल्हासात मोठ्या भक्तीभावाने भाविकांनी सात दिवस आध्यात्मीक ज्ञाण श्रवण केले. भक्तीमय वातावरणात सांगता सोहळ्याच्या परवणीचे लाखो भावीक साक्षीदार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगता सोहळ्यासाठी गुरूवारी (17 एप्रील) शासकीय दौरा जाहिर करण्यात आला होता.
गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या किर्तणाने सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांचा व्यासपीठावर सत्कार सोहळा संपन्न झाला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुकडीचं पाणी मिळावं ही ग्रामस्थांची मागणी आहे, पण एका हौदातून किती उपसा करणार? त्यापेक्षा कृष्णा- कोयणाच्या पुराचं 30 टीएमसी पाणी वळण बंधार्याच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळणार आहे. या हक्काच्या पाण्याने मराठवाड्याचा दुष्काळ नष्ठ होणार आहे.
त्याचबरोबर गोदावरी खोर्याचं समुद्रात वाहून जाणांर 53 टीएसी पाणी मराठवाड्यात आणण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील गावं पाणीदार होणार आहेत. वारकरी सांप्रदयाची पंरपरा लाभलेला बीड जिल्हा आहे, गेल्या 93 वर्षापासून गडाने फिरत्या नारळी सप्ताहाची परंपरा जोपासली आहे. मागील काळात गडाची विकास कामं केली आहेत. येणार्या काळातही गडाच्या विकास कामांसाठी आम्ही कुठे कमी पडणार नाहीत, गडावर येणार्या प्रत्येक भाविकांना सुविधांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही तत्पर असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. मान्यवरांच्या मनोगता नंतर लाखो भाविकांना महापंगतीचा प्रसाद घेतला.
Comments