मराठा आरक्षणासाठी आता मुंबई जाम आंदोलन !
- Navnath Yewale
- Apr 28
- 2 min read
..तर मराठे आता दंडुके हातात घेऊन रस्त्यावर उतरतील; जरांगे पाटील यांची छगण भुजबळ यांच्यावर सडकून टिका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांसाठी पुन्हा एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. आमदार छगण भुजबळ याच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी 30 एप्रिल रोजी निर्णायक बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा इशारा पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री,आमदार छगण भुजबळ यांनी शिंदे समितीने 58 लाख नाहीतर केवळ 58 नोंदी शोधल्या आहेत. मराठा आरक्षण विरोधात मा.न्यायालयात जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, आमदार भुजबळ यांच्या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.
आयोजीत पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे पाटील आमदार भुजबळ यांच्यावर सडकून टिका करताना म्हणाले की, छगण भुजबळला आम्ही आता मोजीत नाहीत, ते कसं आहे पिसाळलेलं कुत्र कसं असतं तसं त्याचं आहे, त्याला महाराष्ट्र शांत राहिलेला जमत नाही. जाती-जातीत तेढ निर्माण करुन द्वेष पसरवण्याचा त्याचा धंदाच आहे. त्याला आता सगळ्यांनी ओळखलं आहे.
सरकारनी त्याला ओळखनं गरजेचं आहे, मराठ्यांनी त्याला ओळखलय असे किती आले तरी काही फरक पडणार नाही. सरकारला वाटत असेल मराठा एकजूट नाही पण सरकारला लवकरच कळेल मराठा काय आहे. छगण भुजबळ यांनी मराठ्याचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करु नये अन्यथा आता मराठे हातात दंडूके घेतील.
सरकारने जानेवरी 2025 मध्ये तिन महिण्याची मुदत घेवून उपोषण सोडले होते अद्यापर्यंत आठ पैकी एकाही मागणीची पुर्तता झालेली नाही. दरम्यान, आठ पैकी चार मागण्या तात्काळ मान्य करण्यात येतील आणि उर्वरित चार मागण्यांसाठी तिन महिण्याची मुदत घेतली होती. मधल्या काळात उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी भेट घेवून 23 एप्रिल रोजी सरकारशी चर्चाचे अश्वासन दिले होते. पण आता 28 तारखेचा वेळ दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासह तिन्ही गॅजेट, आंदोलकांवरील गुन्हे, सगेसोयरे यासह इतर आठ मागण्या पैकी एकी मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. पण आता 30 एप्रिल रोजी मराठा समाजाच्या निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये चार ते पाच घोषणा करुन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. प्रसंगी ठरवू पुढील आंदोलनाची दिशा असेही जरांगे पाटील म्हणाले.
Comments