महंत नामदेव शास्त्रींच्या ‘त्या’ विधानानंतर भागचंद महाराज संतापले, ‘मग जातीवाद कोण करतं?’
- Navnath Yewale
- Apr 17
- 2 min read

प्रसिद्ध किर्तणकार भागचंद महाराज झांजे यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्यावर टीका केली आहे. भगवान बाबा मारतात तेव्हा काठीचा आवाज येत नाही. मात्र जीवन उद्धवस्त होतं. तुम्ही मराठा समाजाचे 50 मुले सांभाळून समाजावर उपकार करता का? अशा शब्दांत भागचंद महारज यांनी नामदेवशास्त्रींवर टीका केली आहे.
भगवान बाबांची काठी कुणालही लागलेली नाही- भागचंद महाराज
“ आज नारळी साप्तहानिमित्त नामदेव महाराज शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं. संत भगवान बाबांची काठी लागली तर कुणाला कळत नाही, असं ते म्हणालेत. मात्र भगवानबाबांच्या चरित्रामध्ये त्यांची काठी कुणालाही लागल्याचा उल्लेख नाही. आजही भाविक -भक्त संत भगवान बाबांना मानतात. कारण त्यांच्याच कृपेमुळे असंख्य भक्तांचं कल्याण झालं आहे. म्हणूनच खर्या अर्थाने संत भगवानबाबांसाठी महाराष्ट्रातील, देशातील, परदेशातील भाविक येतात. भगवानबाबांची काठी कुणालाही लागलेली नाही. तसा कुठेही उल्लेख नाही” अशी घणाघाती टीका भागचंद महाराज यांनी केली.
मग खरा जाीवाद कोण करतो?
आम्ही 200 मुले सांभाळतो. त्यातील 50 मुले ही मराठा समाजाची आहेत. कधी आळंदीला जा. तिथे कितीतरी मुलं रोज वारकरी संप्रदायामध्ये घडतात. तिथे कधीच जात विचारली जात नाही. संत भगवानबाबांनही कधीच कुणाच्या जातीचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी कधी कुणाचा धर्म विचारला नाही. आज तुम्ही 50 मुलं सांभाळून जात काढता. वरुन म्हणजा की जातीवाद करू नका. मग खरा जातीवाद कोण करतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “जर तुम्ही जातीचा उल्लेख करून एवढी मुलं सांभाळतो असे सांगता.मग तुम्ही एखाद्या समाजावर उपकार करता का. संत भगवान बाबा यांचे फक्त एकाच समाजातील भक्त आहेत का? तुम्ही एवढ्या उंचीवरच्या व्यक्ती आहात. तुमच्या तोंडून हे वाक्य शोभत नाही” असाही हल्लाबोल भागचंद झांजे महाराज यांनी केला.
नामदेव शास्त्री काय म्हणाले होते?
भगवान गडाचा नारळी साप्ताहाची सांगता बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे पाडली. यावेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वाणी बंद पडलेली आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असे अवाहन केले. तसेच पुढे बोलताना भगवानबाबा जेव्हा मारतात तेव्हा त्यांच्या काठीचा आवाज येत नाही. भगवानगडाशी छेडछेाड करु नका, असेही नामदेवशास्त्रींनी म्हटलं. भगवान बाबांच्या काठीचा उल्लेख करून महंत नामदेवशास्त्रींनी केलेल्या याच विधानावर भागचंद महाराजांनी संताप व्यक्त केला.
Comments