top of page

महायुती सरकारच्या शंभर दिवसांचा निकाला जाहिर!

अदिती तटकरेंचा विभागा प्रथम; मुख्यमंत्र्याचा समान्य प्रशासनासह दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे विभाग ढिसाळ



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले.


100 दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचे समोर आलं आहे. सार्वक्षनिक बांधकाम विकास दुसर्‍या क्रमांकावर आहे. भाजपचे तीन विभाग टॉप पाचमध्ये आहेत. पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आदिती तटकरेंकडे असलेला महिला व बालविकास आघारीवर आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

फडणवीसांची सोशल मिडिया पोस्ट

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदे तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणूकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे..

-5 मंत्रालयीन विभागांचे सचिव, -5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, 5- जिल्हाधिकारी , -5 पोलिस अधीक्षक, -5 मुख्यकार्यकारी अधिकारी (जि.प.) -4 महापिलका आयुक्त, -3 पोलिस आयुक्त, -2 विभागिय आयुक्त आणि -2 पोलिस परिक्षेत्र महानिरिक्षक यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत.

या सर्व अधिकार्‍यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.


सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहिर

अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम आहे. अदिती तटकरेंच्या खात्याला 80 टक्के गुण मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकावरती आहे, माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभाग 66.15 टक्के गुण मिळाले आहेत. ग्रामविकास विभाग चौथ्या तर परिवहन व बंदरे विभाग पाचव्या स्थानी आहे.


चंद्रपुरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम

चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना 100 पैकी 84.29 टक्के गुण कोल्हापुरचे जिल्हाधिकारी 81.14 टक्के गुणांसह द्वितीय जळगांवचे जिल्हाधिकारी 80.86 टक्के गुणांसह तृतीय स्थानी अकोल्याच्या जिल्हधिकार्‍यांना चौथ्या क्रमांकाचे 78.86 टक्के गुण नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर 66.86 टक्के गुण


पालघरचे पालिस अधिक्षक राज्यात सर्वोत्तम !

100 दिवसांच्या कामांत पालघर पोलिस अधिक्षकांना 90.92 टक्के गुण नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक 80 टक्के गुणांसह द्वितीय स्थानी जळगांवचे पोलिस अधिक्षक 65.71 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी, सोलापूर ग्रामीणचे पालिस अधिक्षक 64 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.


ढिसाळ काम करणारे तीन विभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकउे असणारा अन्न- नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे. तिन्ही विभागांना 35 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के, नागरिविकास विभागाला 34 टक्के तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्केच गुण मिळाले आहेत.

コメント


bottom of page