महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक बेपत्ता ही आफवा - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- Apr 27
- 2 min read

व्हिसाची मुदत संपल्यानंतर, कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला राज्यात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सुरक्षा राखण्यासाठी राज्यभरात संशयास्पद नागरिकांची सखोल तपासणी आणि देखरेख केली जात आहे. पहलगाम पाकिस्तानी हल्ल्यानंतर, केंद्र सरकारने देशात राहणार्य पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याचा आदेश जारी केला होता. दरम्यान, महाराष्ट्रातून 107 पाकिस्तानी नागकि बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या.
या वृत्तावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी निवेदन जाहिर केलं आहे. त्यांनी निवेदनात म्हटल आहे की, 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याच्या अफवा खोट्या आहेत. मी स्पष्ट करू इच्छितो की, सर्वांना शोधण्यात आले आहे. त्यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला येथे राहू दिले जाणार नाही. मला आशा आहे की, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ते त्यांच्या देशात परत जातील.’ राज्याचे गृृहमंत्री योगेश कदम म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आहेत.
राज्यात कुठे किती पाकिस्तानी नागरीक
नागपूर 2458, ठाणे 1106 , पिंपरी चिंचवड 290, जळगाव 393, नवी मुंबई 239, अमरावती 117, पुणे 114, वासीम 106, छत्रपती संभाजीनगर 58, कोल्हापुर 58, मीरा भाईंदर 26, अकोला 22, अहिल्यानगर 14, यवतमाळ 14, रायगड 17, सोलापुर 17
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, सुमारे 1000 पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर राज्यात आले आहेत, त्यापैकी वैद्यकिय व्हिसा धारकांना दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्याच वेळी 4000 नागरिक दिर्घकालीन व्हिसावर राहत आहेत. यापैकी 1000 सार्क व्हिसा धारक आहेत जे चित्रपट, औषध, पत्रकारिता आणि वैयक्तिक कामासाठी आले आहेत. काही पाकिस्तानी नागरिक 8-10 वर्षापासून राज्यात राहत आहेत आणि काहिंनी येथे लग्नही केले आहे. अनेकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केले आहेत.
संशयास्पद नागरिकांची सखोल चौकशी
व्हिसा मुदत संपल्यानंतर, कोणत्याही पाकिस्तानी नगारिकाला राज्यात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सुरक्षा राखण्यासाठी राज्यभरात संशयास्पद नागरिकांची सखोल तपासणी आणि देखरेख केली जात आहे. महाराष्ट्राचे मंत्री योगेश कदम यांनी शनिवारी सांगितले की, राज्यात 5000 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत, पैकी 1000 अल्पकालीन व्हिसावर आहेत आणि केंद्राच्या निर्देशानुसार त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, काही लोक गेल्या 8-10 वर्षापासून भारतात राहत आहेत, काहींनी येथे लग्न केले आहे आणि काहींनी त्यांचे पाकिस्तानी पासपोर्ट सादर केले आहेत. आणि भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.
Comments