महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी 107 जण बेपत्ता;फक्त 51 पाकिस्तान्यांकडे वैध व्हिसा
- Navnath Yewale
- Apr 27
- 2 min read

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोहोबाजून घेरले आहे. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशातील नगरिकांना भारत सोडण्याचे सक्त निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार राज्यात पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेवून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठविण्याच्या हालचालींना वेग असता राज्यातील 48 शहरात एकून 5023 पाकिस्तानी नागरिक अढळले असून 107 पाकिस्तानी नगारिक बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान,राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुतद संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.
पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले 18 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रील पासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. यानंतर अमित शाह यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा , असे निर्देश दिले आहेत.
अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या 48 शहरात एकून 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यामध्ये नागपूर शहरात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलिस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय.
योगेश कदम काय म्हणाले?
सध्या महाराष्ट्र 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आहेत. यातील एक कॉलम अनट्रसेबल पाकिस्तानी नागरिकांचा आहे. ज्यांचा व्हिजाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क करूण त्यांना परत पाकिस्तानला पाठवायचे आहे, पण त्यांच्याशी संपर्क होत नाहीय किंवा ते सापडत नाहीत. अशी हे पाकिस्तानी लोक आहेत.असं योगेश कदम यांनी सांगितलं आहे.
सार्क व्हिजा आणि शॉर्ट टाईम व्हिजावर असलेल्यांना आलं आहे. जे वैद्यकिय उपचारांसाठी आहेत त्यांना दोन दिवस वाढवून देण्यात आले आहेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत देश सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणं अजुन सुरू आहे. त्यामुळे आकडेवारी बदलू शकते, असंही योगेश कदम म्हणाले.
कार्यवाही युद्धस्तरावर - मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नगारिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून , त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रुचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्वराजकिय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व.इंंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता.
Comments