top of page

राजेंंद्र घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू; दमानिया म्हणतात..



46 वर्षीय मनाली रोजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनाली रोजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.


राजेंद्र उर्फ राज घनवट हे धनंजय मुंडे यांचे व्यवसायिक भागीदार असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी केला होता. आपन कोणताही दावा करत नाहीत. परंतु अफवा आहेत की मनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, घनवट कुटुंब त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणाचा तपास करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं

खूप खूप धक्कादायक! राज घनवट , जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही.पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपण्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या आहेत. व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूलमंत्री बावनकूळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गीक मृत्यू असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.


राजेंद्र घनवट यांच्यावरील आरोप

काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत राजेंद्र घनवट यांचा उल्लेख केला होता. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत त्यांच्या जमिनी लाटल्या. खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणले. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जिवंत यांना मयत केलं आणि व्यवहार केला. धनंजय मुंडे चार वर्षांपूर्वी माझ्याकडे तेजस ठक्कर यांच्या सोबत आले होते. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात पुरावे घेऊन प्रकरण लावून धरा यासाठी धनंजय मुंडे आले होते.


यावेळी राजेंद्र घनवटही त्यांच्यासोबत असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले होते. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदार्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटले आहे. यात दोन संचालक आहेत त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट या दोघांनी 11 शेतकर्‍यांना छळून त्रास दिला आहे. जे जे शेतकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत, असा आरोप दमानियांनी केला होता.


Comments


bottom of page