राज्यात कुठे वादळ... तर कुठे.. मुसळधार पावसाचा इशारा !
- Navnath Yewale
- Apr 28
- 2 min read

उत्तर भारतात तिव्र उष्णतेचा कहर सुरूच आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे, तर काही राज्यांमध्ये वादळ आणि जोरदार वार्यांबाबतचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 30 एप्रिलपर्यंत पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी नारंगी आणि पिवळ्या रंगाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली- एनसीआरमध्ये आकाश ढगाळ राहील. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये वादळाचा अंदाज वर्तवला आहे.
दिल्ली एनसीआरमध्येही आता उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. वेगवेगळ्या भागात तापमाण 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. तथापि, हवामान खात्याने अद्याप तीन ते चार दिवसांपासून दिल्लीत उष्णतेच्या लाटेबाबत कोणताही इशारा जारी केलेला नाही. सोमवारी दिल्लीत ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगितले की. सोमवारी दिल्लीत “ अंशत: ढगाळ आकाश राहिल पृष्ठभागावरील वारे ताशी 10-20 किमी वेगाने वाहतील आणि ते 30 किमी प्रतितास वेगाने वाहतील कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जे सामान्यापेक्षा 1 ते 3 अंश सेल्सिअस जास्त आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये 1 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात 2 मे पर्यंत उष्णता राहील. सोमवार 28 एप्रिल रोजी जम्मूमध्येही तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. आयएमडीने 1 मे पर्यंत बिहार, झारखंड, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, किनारी आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये “ उष्ण आणि दमट” हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
या राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा
पुढील सहा दिवसांत ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस, गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे, असाम आणि मेघालयात ताशी 50-60 किलोमिटर वेगाने वारे वाहतील. 30 एप्रिलपर्यंत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ आणि छत्तीगडच्या काही भागात विखुरलेला ते हलका मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याच बरोबर 30 एप्रिलपर्यंत पश्चिम बंगाल, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये वादळाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुढील सहा दिवसांत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकल येथे गडगडाची वादळे विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 29 आणि 30 एप्रिल रोजी केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा आंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Comments