राज ठाकरेंनी हिंदीचा विषय समजुन घ्यावा- मंत्री बावनकुळे
- Navnath Yewale
- Apr 19
- 1 min read

महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय बंधनकारक करण्यावरुन सध्या रान पेटलं अहो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याला सुरवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात रस्त्यावर उपरुन आंदोलनही केलं. पण आता भाजपकडं त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज ठाकरेंनी हा विषय समजून घ्यावा, असं अवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बावनकुळे म्हणाले की, “ राज साहेबांना माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे, कारण राज साहेब समजदार आहेत. कारण एखादा विषय एज्यूकेशन पॉलिसीमध्ये आला असेल तर हिंदीचा विषय आपल्या शिकण्यात, बोलण्यात समावेश असला पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात एखादी भाषा जर हिंदी असली तर त्यात काय बिघडलं? राज साहेबांनी या विषयावर थोडं समजून घेतलं पाहिजे की, केंद्राचा राष्ट्रीय पॉलिसी आणण्याचा उद्देश काय होता? मी राज ठाकरेंना भेटीन वाटल्यास आणि त्यांना विनंती करेल की आपल्याला राष्ट्रीय पॉलिसी लागू करावी लागेल, ती सुद्धा आपल्याला पुढे न्यावी लागेल.
या देशात एखादं विकासाचं पाऊल घेतलं की, त्याला थांबवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर होतं. पण जर देशात एखादी राष्ट्रीय पॉलिसी येत असेल आणि त्यात हिंदी विषय असेल तर त्याला इतकं मोठं राजकारण करुन, आंदोलन करुन, लोकांना मारहाण करुन हे योग्य नाही. हिंदी भाषा देखील प्रत्येकाला आली पाहिजे, देशात सगळीकडं फिरत असताना दखादी कॉमन भाषा असावी. देशातील जवळपास 60 टक्के राज्यांमधील कारभार हा हिंदीतून चालतो. त्यामुळं त्या त्या राज्यांच्या भाषेची अस्मिता ठेवून हिंदी आली पाहिजे. मला वाटतं यांत काही गैर नाही, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Comments