top of page

रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की, जाळलं?

आमदार अनिल परबांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

ree

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. मृत्यूपत्र तयार करण्यात आलं. असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला. या आरोपांनंतर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.


ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यासह त्यांचे पूत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. ज्योती रामदास कदम यांनी 1993 साली आत्महत्येचा प्रयत्न का केला? त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न का केला? जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळलं? याची चौकशी झाली पाहिजे. आजही खेडमध्ये याचे साक्षीदार आहेत. वेळ पडली तर मी त्यांनाही समोर आणू शकतो. खूप जण त्याचे साक्षीदार आहेत. ते स्वत: सामेरून सांगतात की आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍यांचं बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा, असंही अनिल परब म्हणाले.


रामदास कदम यांना माफी मागावीच लागेल, नाहीत त्यांना कोर्टात खेचणार आहे. रामदास कदमांविरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत. मेलेल्या माणसाचे ठसे घेतले तरी त्याचा काही उपायोग होत नाही, त्याचं ज्ञान कच्च आहे. लोकांच्या मनाज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विष कालवण्यासाठी, घृणा तयार करण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे. शिशुपालचे आता शंभर अपराध पूर्ण झाले आहेत. येत्या विधानसभेत मी सगळं माडणार आहे, असंही परब म्हणाले.


दरम्यान मंत्री योगे कदमांना आव्हान देताना अनिल परब म्हणाले की, “ 1993 साली तुझ्या आईनं आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला, स्वत: ला जाळून घेण्याचा का प्रयत्न केल, याची चौकशी कर. रामदास कदमांच्या पुतण्याने का आत्महत्या केली? याची चौकशी करा. घरातील लोक आत्महत्या करत आहेत. कशासाठी करत आहेत. हे बाहेर आलं पाहिजे असं अनिल परब म्हणाले.

Comments


bottom of page