राहुल गांधी मोदींच्या भेटीला; सरन्यायाधिशही हजर, सीमारेषेवर तणाव, दिल्लीत बैठकांची धाव
- Navnath Yewale
- May 5
- 1 min read

पहलगाम हल्ल्या नंतर भारत - पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची पूर्व तयारी केली आहे. त्यातच आता भातर पाकिस्तानचा कधीही बदला घेऊ शकतो अशी परिस्थिती असतानाच राहूल गांधी आज पंतप्रधान मादीची भेट घेणार असल्याची माहिती होती. सीबाआयच्या प्रमुखपदी निवड करण्यासंदर्भात ही भेट होती, अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेसनेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांच्या निवास्थानी राहुल गांधी आणि देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीने देशात गतिमान हालचाली आहेत. त्यातच, आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सीजेआय यांनी पंतप्रधान महोदयांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राहुल गांधी आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती होती. सबीआयच्या प्रमुखपदी निवड करण्यासंदर्भात ही भेट होती, अशी माहिती समोर आली आहे. 14 मे 2025 रोजी सबीआय प्रमुख प्रवीण सूद यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांची बैठक संपन्न झाल्याचे समाजते. नव्या बीआय प्रमुखांच्या निवडीवर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार आणि आथिर्र्क व्यपहारांवरुन एकप्रकारे युद्धच सुरू झालं आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून दिलं असून पाकिस्तानसोबतच्या जल सिंधू करारावरही बंधने घातली आहेत. दुसरीकडे तिनही सीमा दलाच्या प्रमुखयांशी पंतप्रधान मोदींच्या सातत्याने बैठका होत आहेत. त्यामुळे, आजच्या या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. या चर्चेतून मोठा निर्णय केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीश यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोठा निर्णय घेऊ शकतात.
Comentários