top of page

विजग्राहकांना मोठा दिलासा; 26 टक्के विजदर कपात - मुख्यमंत्री फडणवीस


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजदर कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील विज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच विज ग्राहकांना स्वस्त विज मिळाणार आहे. आगामी पाच वर्षात टप्याने 26 टक्के विज कपातीचे धोरणं राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर दिली आहे.


राज्याच्या इतिहासात पथमच पहिल्यावर्षी दहा टक्के आणि टप्याटप्याने कपात करीत पाच वर्षात 26 टक्के विजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्रात राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाला महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे अभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळा पाहिला तर 10 टक्के विजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या, पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने विजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला.


या आदेशाचा घरगुती ग्राहक, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी विज वापरणार्‍याचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खा़त्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोबतच आगामी काळात विजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे विजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही माहिती राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे. असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आजा राज्यामध्ये विज दरामध्ये कपात केली जाणार आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढील पाच वर्षामध्ये टप्या टप्याने विज दरामध्ये 26 टक्के कपात केली जाणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी ज्यांचा वीज वापर असेल अशा विज ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

Comments


bottom of page