top of page

संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानात चाललंय काय? लाहोर- कराची हवाई हद्द चार तासासाठी बंद, सुरक्षेचं कारण


पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव शिगेल पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची विधानं होत आहेत. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतानं त्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच, आता पाकिस्तानला अद्दल घडवणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी जाहिर केल्यानंतर युद्धाची दाट शक्यता आहे. त्यातच आता संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र, वगेळ्याच हालाचाली सुरू आहेत.


पाकिस्तानच्या आजी- माजी राष्ट्रप्रमुखांसह अनेक नेतेमंडळी व लष्करी अधिकार्‍यांनी भारताला सडेतोड उत्तर देण्याची विधानं केली आहेत. असं असताना काही नेत्यांकडून तणाव शांत करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नेमकं काय घडणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता सुरक्षेचं कारण समोर करत पाकिस्तानने अचानक कराची व लाहौरची हवाई हद्द बदं केली आहे.


अवघ्या चार तासच सुरक्षेचा प्रश्न?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारनं कराची व लाहौरची हवाई हद्द संपूर्ण मे महिन्यात रोज पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बदं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा काही स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, दिवसाच्या नेमक्या त्याच वेळी आणि फक्त चार तासांसाठीच सुरक्षेचा मुद्दा कसा असू शकतो.? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पहलगाम हल्ल्यांनतर भारतानं लागू केलेले निर्बंध व करवाईच्या इशार्‍याला पाकिस्ताननं देखील प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्याचबरोबर सीभागात पाकिस्तानकडून पहलगाम हल्ल्यापासून रोज शस्त्रसंधीच उल्लंघन केल जात आहे. पण आर्थिक संकट आणि सिंधू जल करार रद्द झाल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा दुहेरी विवंचनेत सापडलेला पाकिस्तान युद्धासाठी खरंच सज्ज आहे का? हा पकिस्तानसाठी चिंतनाचा विषय आहे.


दरम्यान, कराची व लाहौरच्या हवाई हद्दी चार तासांसाठी बंद ठेवल्यामुळे प्रवासी विमान वाहतुकीवर फार मोठा परिणाम होणार नाही, असा दावा पाकिस्तानच्या हवाई उड्डाण विभागाकडून करण्यात आला आहे. या काळात सर्व प्रवासी विमाने पर्यायी हवाई मार्गाने वळवण्यात येतील, असं नमुद करण्यात आलं आहे.

留言


bottom of page