top of page

परळीत लिंबोटा ग्रामस्थांचा रास्ता रोको, आता या टोळीचा आम्हालाच नायनाट करावा लागेल - जरांगे पाटील, आरोपींची धिंड काढून मकोका लावा- आमदार सुरेश धस; परळीत सत्ता,पैसा, बोगसगिरीची मस्ती - खासदार सोणवणे



बीडमधील परळी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे या तरुणाला समाधान मुंडे आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराळ ीागात नेले आणि लोखंडी रॉड, बांबू व लाकडी दांडक्यांनी अमाणुष मारहाण केली. यातील आरोपी समाधान मुंडे व त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईच्या मागणीसाठी लिंबोटा( ता. परळी) ग्रामस्थांनी सकाळपासून परळी- बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. दूसरीकडे शिवराज दिवटे उपचार घेत असलेल्या अंबाजोगाई शासकीय रुग्णालात नेते, आमदार, खासदार, सामाजीक कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे.




भाजप आमदार सुरशे धस यांनी सकाळी शिवाराज दिवटे याची भेट घेवून घटनाक्रम जाणून घेतला. दरम्यान, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. मारहणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे यांला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी परळी पोलिसांनी आतापर्यत सात आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. आता यावरुन भाजप आमदार सुरशे धस यांनी दिवटे प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा, अल्पवयीन मुलांवर पोरशे कार प्रकरणाचा धागा पकडून कारवाई करा, अशी मागणी केली आहे. सुरेश धस म्हणाले की, शिवराज दिवटे याला झालेल्या मारहाणीची घटना अमानवी आहे. पोलिस दलाने जे चुकीचे वागतील त्यांची जनतेतून धिंड काढावी. त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत. सरपंच देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले आहे, तीच सगळी भाषा शिवराज दिवटे प्रकरणात आहे. असेही धस म्हणाले.


अंबाजोगाई रुग्णालयातील डॉक्टरांचे गुन्हेगारांना अभय : पुढे बोलताना धस म्हणाले की, अंबाजोगाई येथील शासकिय रुग्णालयातील काही डॉक्टर एकाच ठिकाणी पंधरा वर्षापासून आहेत. हेच डॉक्टर पाय मोडला तरी खरचटले म्हणून अहवाल देतात. त्यामुळे हे डॉक्टर मकोकामध्ये आरोपी झाले पाहिजे, याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे. अंबाजोगाई रुग्णालयातील डॉक्टर गुन्हेागरांना अभय देतात. महावदेव मुंडे यांच्या प्रकरणात देखील हेच लोक आहेत, असे आरोप त्यांनी केले.


पुण्यातील पोरशे कार प्रकरणाचा धागा पकडून कारवाई: शिवराज दिवटे प्रकरणात आरोपींवर मकोका लवला जावा, तर उर्वरित दोन अल्पवयीन मुलांवर पुण्यातील पोरशे कार प्रकरणातील धागा पकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी. ज्या ठिकाणी या आरोपींनी गुन्हा केला, त्या ठिकाणी आरोपींना हातकडे घालून रस्त्यावर फिरवावे,जेणेकरून इतर आरोपींच्या मनात भीती निर्माण होईल. यातील आरोपींचे फोटो आकासोबत बाहेर पडले आहेत. त्यामुळे हे लोक कुणाचे आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी केला.


पोलिसांनी आरोपींची धिंड काढावी : उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार येथे येत आहेत. त्यांनी बैठकीपूर्वी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलावं. हे सत्र बंद व्हायला तयार नाही, पोलिसांनी आरोपींची धिंड काढावी. त्या शिवाय हे थांबणार नाही. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्यावर मकोका लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.




परळीत 1990-92 पासून सत्ता, पैसा, बोगसगिरी याची मस्ती- खासदार बजरंग सोणवणे: परळीमध्ये सन 1990-92 पासून सत्ता आहे, आणि त्यामुळे सत्तेतून पैसा, बोगसगिरीची मस्ती आली आहे. मी संविधानीक अधिकाराचा वापर करून न्याय मिळण्यासाठी पाठपुरवा करणार आहे. शिवाय या घटनेच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. जलालपूर मध्ये त्या दिवशी नेमकं काय झालं, भांडण कश्याची झाली, कोणत्या कारणावरुन झाली याच्या खोलात जाणं गरजेचं आहे. येत्या 27 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून परळी येथे एक आयपीएस दर्जाचा अधिकारी देवून कायदा सुव्यवस्था राखण्याची मागणी करणार असल्याचेही खासदार बजरंग सोणवणे म्हणाले.





राज्यातली ही टोळी लोकं म्हणून आता आम्हालाच संपवावी लागेल- जरांगे पाटील


शिवराज दिवटे यांना मारूण टाकण्याच्या उद्देशाने अमाणुष मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या डोक्यात, पोटात, पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. येथील डॉक्टरवर राजकीय दबाव असल्याची शंका आहे, पण डॉक्टरांनी चौकशीच्या फेर्‍यात येऊ नये. संतोष देशमुख प्रकरणातील सह आरोपींना वाचवल्यामुळे हे दिवस पाहायला मिळत आहेत. आमचे लेकरं दिवसाढवळ्या उचलून नेऊन त्यांना मारून टाकले जात आहे. हे आम्ही किती सहन करणार आहोत. सरकार त्यांना थांबवत नसेल तर आता आम्हालाच राज्यभरातील या टोळीचा नायनाट करावा लागेल. संतोष भैय्या प्रकरणावरुन सुधारण्याची संधी दिली होती पण ही अवलाद सुधरणार नाही त्यामुळे या राज्यभरातल्या टोळीचा आम्हालाच नायनाट करावा लागणार आहे.


राज्यातील मराठा समाजाचे राजकीय, सामाजीक शंभर ते दिडशे घराण्यांशी मी लवकच चर्चा करणार आहे. इथून पुढे पोरं मरायचे थांबवायचे असतील तर या टोळीचा नायनाट करावाच लागेल. त्या दोघांनाही सांगितलं होतं, तुमची लोकं आवरा, सुधरा पण त्यांनी ते मोकाट सोडले आहेत. आता आम्ही एका दिवसात या टोळीचा नायनाट कसा करतो ते पहा. मराठा समाजाला अव्हान आहे की, हे चिमुटभर टोळी आहे सगळ्यांनी एकजूटीने त्यांचा समाना करवा लागणार आहे. अजित पवार यांच्या आरोपींची पार्श्वभुमी पाहून कारर्वाच्या मुद्दयावर प्रश्न विचारला असता जरांगे पाटील म्हणाले अजित पवार यांना गुन्ह्याचे गांभीर्य कळत नाही का? त्यांच्या काय पार्श्वभुमी तपासता, अजित पवार यांची जिल्ह्यावर पकड कधी नव्हतीच त्यांच्याकडे चिमटा आहे.



उद्या अजित पवार जिल्हा दौर्‍यावर आहेत त्यांची भेट घेणार का या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले ते काय राष्ट्रपती आहेत का? त्यांची भेट घेण्याची गरज काय आता या प्रकरणात लोक म्हणून आम्हालाच भुमिका घ्यावी लागणार आहे आणि राज्यातील या टोळीचा सुपडासाफ करावा लागणार आहे. या शिवाय खासदार बजरंग सोणवणे यांनी परळीसाठी आयपीएस दर्जाचा अधिकरी मिळावा या मागणीवर जरांगे पाटील म्हणाले की, एक आधिकारी बदलून काय साध्य होणार आहे. खालचे काही अधिकारी, कर्मचारी जागेवरच आहेत त्यातून काही साध्य होणार नाही.

Commenti


bottom of page