top of page


राज्य सरकारला मोठा झटका: लाडकी बहीण योजनेला निवडणूक अयोगाचा प्रतिबंध?
मुंबई: महापालिका निवडणुकाच्या आचारसंहितेचा दाखला देत निवडणुक अयोगाने जानेवारी 2026 चा लाभ आधीच देण्यास बंदी घातली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘ लाडकी बहिण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे . त्याम
46 minutes ago2 min read


त्यांना मतदान करूच नका, जरांगे पाटलांचे आवाहन राज्यभरात खळबळ; महापालिका निवडणुकीसाठी मतदानाच्या 48 तासापूर्वी बुलढाण्यातून इशारा
बुलढाणा: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवरी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजण होणार असून, या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी जाहिरपणे भूमिका मांडल्याने निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणाच्यातील भाषणात त्यांनी मराठा समाजास उद्देशून थेट आणि आक्रमक भुमिका मांडली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आ
3 hours ago2 min read


मोदी सरकार विरोधात टीका; लंडनवासी डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत अटक लंडनहून मुंबईत येताच एअरपोर्टवरून मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबई: लंडनवासी असलेले अनिवासी भारतीय आणि वैद्यकिय डॉक्टर, लेखक, कार्यकर्ते असलेले डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. कोविड काळात या महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्यानं वैद्यकीय मार्गदर्शन करत असत त्यामुळे ते चर्चेत आले होते. मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. मोदी सरकारवर सातत्यानं टीकात्मक भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जाते. असिम सरो
2 days ago2 min read


संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कळशारोपण
बीड : समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे नाथ परंपरेतील महान संत वामनभाऊ महाराज यांचे विचार काळाच्या ओघातही अधिकच सुसंगत ठरत असून, त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्यान्पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत वामनभाऊ महाराजांच्या ५० व्या, सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महा
2 days ago1 min read


सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय कार्यालयात शुकशुकाट! शिरुर कासारला वाली कोण? 22 जणांचा स्टाप, शिपाई वगळता सर्वच गायब!
बीड: शासनाच्या विकास कामासाची महत्वपूर्ण अस्थापना असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरुरच्या उप कार्यालयाच्या 22 जणांच्या स्टाफ पैकी केवळ महिला शिपाई वगळता सर्वजण गायब असल्याने रिकाम्या खुर्च्यांचे प्रदर्शन समोर आले. त्यामुळे कार्यालयाचा कारभार नेमका धाब्यावरून, हॉटेलवरून चालतो का? हा न उलगडणारा प्रश्न आहे. तालुका निर्मितीपासून शिरुर कासार तालुका प्रशासकीय कार्यालयांना वारणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हक्काच्या जागा उपलब्ध करून
3 days ago1 min read


तुकाराम मुंडेच्या आदेशाने बोगस दिव्यांगांची झोप उडाली बोगस प्रमाणपत्र प्रकरणात आता कठोर कारवाई, दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्रांची होणार तपासणी!
बीड: दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्य
3 days ago1 min read


जालिंदरनाथ संस्थानवरील दानपेटी चोरीचा तपास थंडबस्त्यात! नाथभक्तांसह रायमोहा ग्रामस्थ संतप्त; पोलिसांची ‘तपास सुरू’ची नेहमीचीच बतावणी
बीड : जिल्ह्यात नऊनाथांपैकी मच्छिंद्रनाथ (सावरगाव घाट, ता. आष्टी) व जालिंदरनाथ (येवलवाडी, ता. शिरुर का.) यांचे संजिवनी समाधीस्थळ आहेत. नाथभक्तांचे अद्यस्थान असलेल्या येवलवाडी येथील जाज्वल्य जालिंदरनाथ संस्थानमधील दानपेट्या दत्तजयंतीच्या पूर्वरात्री अज्ञात चोरट्यांनी पळवून त्यातील मौल्यवान सोने, चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास केली. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्ष कृतीकरताना दिसून येत आहेत. पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तर
4 days ago2 min read


तीस लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा ढोल; प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा! निदान दर्शनी भागातील रेल्वे स्टेशनवरील वाळलेल्या झाडांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी “विवेक” जागा ठेवून पाहावे - डॉ. गणेश ढवळे
बीड : हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची "इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, या वृक्षलागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) य
4 days ago1 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी: आरोपींना महत्वाचे डिजिटल पुरावे, पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्यावेत - कोर्टाचे आदेश
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या बहुचर्चित प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्याकांडा प्रकरणी गुरूवारी (दि.8 जानेवारी) बीड येथील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये पुराव्यांची देवाणघेवाण, आरोपींचे अर्ज आणि तांत्रिक कागदपत्रांवरून जोरदार खडाजंगीचा युक्तीवाद पाहायला मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. या प्रकरणातील महत्वाचे डिजिटल पुरावे असलेले पेन ड्रा
4 days ago2 min read


लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचा पलटवार
लातूर : दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही.. जय महाराष्ट्र ” असं म्हणत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिलंय लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण सोमवारी लातूरमध्ये आले होते. एका प्रचारासभेत ते लातूरच्या राजकारणाविषयी बोलत होते. यावेळी बोलताना, “ खरं तर आल्या स
6 days ago1 min read


तहसीलकार्यालयात दर्पण दिन उत्साहत; प्रशासनाकडून पत्रकारांचा सन्मान
बीड: अद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेर यांची जयंती, दर्पण दिन शिरुर कासार तहसील कार्यालयात उत्साहात साजारा करण्यात आला. तालुक्यातील विविध माध्यम प्रतिनिधींचा यावेळी तहसीलदार सुरशे घोळवे यांनी सन्मान केला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज मंगळवारी (6 जानेवारी) शिरुर कासार शहरात दर्पण दिन साजरा करण्यात आला. आदर्श पत्रकार संघाच्या वतिने छत्रपती संभाजी महाराज चौकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनकरून मान्यवरांच्या उपस्थित
6 days ago1 min read


खांद्यावर शिवळाटं, डोक्यावर तुरपिकाचा कडप घेवून आक्रोश! उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला हमी भाव, खरेदी केंद्र सुरू करावीत, कवडीमोल खरेदीतून लूट थांबवा - शिवसेना (उबाठा)
बीड: यंदा अतिवृष्टीने खरिपाच्या उत्पादनात पटीने घट तर झालीच पण बहूतांश शेतकर्यांचे खरिपाचे पिकच हिरावले. आधीच संकटाशी दोन करताना कर्जाच्या खाईत लोटला गेलेला शेतकर्यांची कवडीमोल शेतमाल खरेदीतून लूट सुरू आहे. कापुस, तूर, गहू हरभरा या उत्पादनाची शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी यासह इतर मागण्यासांठी तालुकाप्रमुख सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज अभिनव आंदोलन करण्यात आले. बीडच्या शिरुर कासार शहरातील जिजामाता चौकात शिवसेना (उबाठा) च्या
Jan 51 min read


मुंबईच्या देवनारमध्ये अडीच कोटींची रक्कम सापडली, भरारी पथकाची कारवाई; दोन व्हॅनच्या तपासणीतनू रक्कम ताब्यात
मुंबई: राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून वाहतूकीसह राजकीय पक्षांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. निवडणुकांच्या हालचालींवर भरारी पथकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अशातच मुंबईतून मोठी घटना समोर आली आहे. भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रेाकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक अयोगाच
Jan 51 min read


नगरपंचायत प्रशासनाकडूनच समाजिक न्याया च्या उद्देशाची अवहेलना? व्यवसायिक ‘पत्रा स्टॉल’ चा मुतारीसाठी वापर; समाजकल्याण, समाजिक न्याय विभागाच्या कारवाईकडे लक्ष
बीड: वंचति, शोषित आणि उपेक्षीत घटकाना संरक्षण व त्यांच्या उन्नतीच्या उद्देशाने शासनास्तरावरून 100 टक्के अनुदान तत्वावर लोकहिताच्या योजना राबवण्यात येतात. यामध्ये गटई कामगारांसाठी पत्रा स्टॉल च्या योजनेचा समावेश आहे. मात्र, बीडमधील शिरुरनगरपंचायत प्रशासनेच शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत पत्रा स्टॉल चक्क मुतारीसाठी वापरात आणल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गटई कमागारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देणे तसेच त्यांची आर्थिक उन्नती करणे या महत्वकांशी उद्देशाने शासनाच्
Jan 42 min read


बिनविरोध आलेले नगरसेवक आयोगाच्या रडावर! निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना सूचना
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छाननीनंतर अर्ज वैध ठरल्यापासून राज्यभरातून सत्ताधारी नेत्यांकडून तसेच यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येत आहेत. त्या पार्श्
Jan 32 min read


शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्याचा भिमाशंकर मंदिरात राडा; पूजार्याला मारहाण
पुणे : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अयलेल्शस भिमाशंकर मंदिरात जबर माहरणीचा प्रकार घडला आहे. शिवसेना (शिंदे ) गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षाने थेट पूजार्याला मारहाण केल्याने मंदिर प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजार्याला मारहाण केली. योगेश शिर्के असे या पुजार्याचे नाव असून अद्यापतरी कुठलीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नाही. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांन
Jan 21 min read


...अन्यथा महानगरपालिकेतील सर्व उमेदवार पाडू- जरांगे पाटील पुण्यात एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा; सकरने तत्काळ मार्ग काढण्याचा इशारा
पुणे: पुण्यात मध्यरात्री अचानक एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. शासनाची जाहिरात उशिरा लागल्याने वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याच्या मुख्य मागणीसाठी लाखो विद्यार्थी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास शास्त्री रोडवर गोळा झाले. अचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांना आदेालनास परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे. राज
Jan 22 min read


जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार ; नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1363 विकास कामांचे उद्घाटन
बीड : बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश्यक आहे. भारतीय संविधान, कायद्याचा आदर करत बीडकरांनी दैनंदिन जीवनात बीडच्या विकासासाठी शिस्त पाळावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासीयांना केले. जनतेच्या पैशातून होत असलेली विविध विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, यावर बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी केल्या. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर
Jan 12 min read


शौर्य दिनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अनुयायांकडून अभिवादन
पुणे: शौर्यदिनाच्या निमित्ताने आज 1 जानेवारी 2026 रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायांचा जनसागर लोटाला होता. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच वियजस्तंभ परिसर घोषणांनी दणाणून गेला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देऊन 500 शूरवीरांना मानवंदना दिली. विजयस्तंभाजवळ उपस्थितांना संबोधित करताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या लढ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित केले. ते म्हणा
Jan 11 min read


भारत फक्त एका व्यक्तीचा नसून, सर्वांचा आहे - आरएसएस प्रमुख मोहण भागवत
सोनपरी (छत्तीगड): देशात स्थलांतरितांवर वाढत्या हल्ल्यानंतर आणि अलिकडेच देहरादूनमध्ये त्रिपुरा येथील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. वांशिक हल्ल्यात आपला जीव गमावलेल्या विद्यार्थ्याच्या प्रकरणानंतर, भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की भारत कोणत्याही एका वर्गाचा किंवा समुदारयाचा नाही, तर तो प्रत्येक भारतीयाचा आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या जाती, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीच्या आधारे कोणाचाही न
Jan 12 min read
bottom of page