top of page


अशोक खरात प्रकरणी रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेते चक्क...
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. रोज या प्रकरणात अजूनही नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच भोंदुगिरी करून कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. त्याचबरोबर त्यांने काही आर्थिक घोटाळेही केल्योच समोर आले आहे. महत्वाची बाब म्हणजे अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही समोर आलेले आहे. तसेच इतरही नामांकित व्यक्ती खरातच्या काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही सूमोर आलेले आहे. तसेच इतरही न
4 hours ago1 min read


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपालीकणकरांची एसआयटीकडून 7 तास चौकशी
राज्याला हादरून सोडणार्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज कसून चौकशी करण्यात आली, तब्बल 6 तासांपासून एसआयटी कडून त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे एसआयटीने रुपाली चाकणकर यांना नेमके काय प्रश्न विचारले, नेमकं कोणत्या प्रकारची चौकशी झाली, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यातच, चाकणकर यांनी एसआयटी पथकापासून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यापूर्वी, एसआयटीने चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे वृत्त झळक
5 hours ago2 min read


वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्कफ्रॉम होम करा; पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करा- पंतप्रधान मोदी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे भारतात पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच पीएम मोदी यांनी सर्व भारतीयांना महत्वाचे आवाहन केले आहे. वर्षभर सोनं-चांदी खरेदी करू नका आणि पेट्रोल- डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटींग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले. पीएम मोदींनी या आवाहानामागची कारण देखील सांगितली आहेत. पीएम मोदी यांनी तेलंगणात
5 hours ago2 min read


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच; 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थांच्या गैरवापराला आळा- मुख्यमंत्री विजय थालापती
आज 10 मे 2026 रोजी, अभिनेते-राजकारणी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर तामिळनाडूचे राजकीय चित्र बदलले. काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून, विजय यांनी शपथविधी सोहळ्याला एक आधुनिक स्पर्श दिला. त्यांनी 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थाविरोधात विशेष दल स्थापन करण्याची घोषणाही केली. वास्तविक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी या तीन घोषणा केल्या. मुख्यमंत्री
5 hours ago3 min read


जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत स्थानिकांना 70 टक्के जागा राखीव भूमीपूत्रांच्या रोजगारासाठी राज्य सरकाराचा महत्वकांक्षी निर्णय
मुंबई : महायुती सरकारने भूमिपूत्रांच्या रोजगारासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापूढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती करताना 70 टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपूत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी मिळणार आहे. राज्य सरकारने स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार देण्यासाठी महत्वाचा निर्णय जारी केला आहे. जिल्हा मध्यव
2 days ago1 min read


टीव्हिकेनं बहुमत गाठलं: काँग्रेससह डाव्या पक्षांचा टीव्हिकेला पाठिंबा राज्यपाल सत्तास्थापनेचं निमंत्रण देईनात; टीव्हिकेची सुप्रीम कोर्टात याचिका
टीव्हीकेनं काँग्रेससह डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा गाठल्यानं तामिळनाडूतला सत्तेचा खेळ आता सोपा झाला आहे. पण राज्यपालांच्या भूमिकेमुळं सत्तास्थापनेवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळं आता टीव्हिकेच्या एका सदस्यानं वैयक्तिकरित्या थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत त्यामुळं आता राज्यपाल स्वत:हून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात की सुप्रीम कोर्टालाच त्यांना तसे निर्देश द्यावे लागतात का? हे पाहवं लागणार आहे. टीव्हिकेची सुप्रीम कोर्टात याचिका : तमिझगा वेट्री क
2 days ago1 min read


नवरदेवाचा बुट नवरीची चप्पल लापवल्यावरुन लग्नमंडपातच वर्हाडी आपसात भिडले , जालनातील लग्नातल्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल; आंबड पोलिसात दोन्ही पक्षाकडील लोकांवर परस्परविरोधात गुन्हे
जालना: विवाह म्हटलं की, पाहूण्यांचा मेळा, वधू-वरांचा सुरेल संगम आणि मित्र परिवाराची मौज अशा द्विगूनीत आनंदाचा क्षण म्हणजेच विवाह सोहळा. दूरचं नातं जवळ येतं, नात्याची विण घट्ट करणार्या विवाह सोहळ्याच्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध परंपरा आहेत. महाराष्ट्रातही विविध भागात वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. विवाह सोहळ्यात लहान थोरांपासून सर्वचजन आनंद साजरा करतात. मात्र, किरकोळ कारणावरुन विवाह सोहळ्याचा आनंदान विर्जन पडावे! असाच प्रकार असा प्रकार जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. या वि
2 days ago1 min read


कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज
मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घुण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, अशी मागणी केली आहे. यासाठी दोघांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने यापुर्वीच या दोघांची ही मागणी फेटाळली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचे जामीनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. वाल्मिक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्
3 days ago2 min read


बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक जमिन भूसंपादन घोटाळा; कोट्यावधींच्या भ्रष्टाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ
बीड: जिल्ह्यात भूसंपानामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (दि.7) लातूर येथील राहत्या घरातून बीड पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी थेट जिल्हाधिकार्यांनाच अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. बीड येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना अविनाश पाठक यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या
3 days ago1 min read


पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने ‘ईडी’ची कारवाई; पोलिस उपायुक्तांभोवती फास आवळला
पश्चिम बंगालाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर प्रशासनातही मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यात 15 वर्षे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या त्यामुळे निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेही अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. निकाल समोर आल्यानंतर काही तासांतच राज्याच्या मुख्य आयुक्तांनी सर्व विभागांना कोणत्याही महत्वाच्या फायलींना हात न लावण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान आता, अंमल बजावणी
5 days ago2 min read


कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना
मुरबाड: कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला आहे. अघातामध्ये स्कॉर्पिओमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जणं गंभीर जखमी आहेत. विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक बसल्याने हा अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-आहिल्यानगरसाठी सकाळी 8:30 वाजाता ही एसटी निघाली होती. मुरबाड तालुक्यातील टोकावडे- वैशाखरे हद्दीत स्कार्पिओ कारसोबत बसची धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थ
5 days ago1 min read


नसरापूर घटनेनंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; लैंगिक शोषण करणार्या नराधमांनाबाबत मोठा निर्णय
मुंबई: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षाच्या या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. यसा प्रकरणानंतर आता महाराष्ट्राच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लैंगिक शोषण करणार्या नराधमांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीत दिले आहेत. लैंगिक प्रकरणातील आ
5 days ago1 min read


फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे, अपटावेच लागणार- जरांगे पाटील
अकलूज: देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. भाजपने तीन राज्यात स्पष्ट बहुमत सरकार स्थापन होईल, एवढे संख्याबळ मिळवले आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने द्विशतक ठोकत ममता दिदींच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. भाजपने मोठ्या फरकाने बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, विरोधकांनी देखील भाजपच्या विजयावर एसआयआर, ईडी, सीबीआय, निवडणुक आयोग, न्यायव्यवस्थांसारख्या संस्थांचा वापर करून मतचोरी केल्याचं
5 days ago2 min read


राज्य महिला आयोगाच्या अध्यपदी डॅशिंग मिरा बोरवणकर यांची निवड!
मुंबई: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा नाजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यानंतर या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर याची निवड निश्चित मानली जात आहे. आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘ लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणार्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयेागाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पोलिस दलातील प्रदिर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या
6 days ago2 min read


इंदोरीकर महाराज यांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्यात दिग्गजांची मांदिआळी
राज्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्येचा आज संगमनेरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. निवृत्ती महराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी झाला. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्याच्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच टीका झाली, त्यानंतर आज इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाहसोहळा प
May 32 min read


रुग्णवाहिकेत चिमुकलीचा मृतदेह ठेवून आंदोलन: पुण्याच्या नवले पुलावर वाहतूक कोंडी, नराधम आरोपीस फाशीची मागणीआंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिस बळाचा वापर; चार तासानंतर वाहतूक कोंडी फुटली
पुणे: नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे. संतप्त आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हा पूल मोकळा केला. त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर स्थगित झालं असून, प्रशासन, सरकारवर आंदोलकांनी गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. नवले पुलाची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्यानं अखेर वाहतूक कोंडी फुटली आहे. भोर तालुक्यातील
May 32 min read


इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह; 100 एक्करावरील आलिशान मंडप पाहून डोळे दिपतील,जेवनाची रेलचेलसंत-महंत, पै..पाहूण्यांसह मोठमोठ्या राजकारणी दिग्गजांना निमंत्रण
समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. तब्बल 100 एक्कर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरूवात होईल. साधेपणाचा संदेश देणार्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर सदैव चर्चेत असतात. कीर
May 22 min read


दीडकोटी घेवून कीर्तनकाराचे पलायन?, रिव्हाल्व्हरची चर्चा
लातूर: लातूर जिल्ह्यातील खंडापूर इथं जगद्गुरु तुकोबाराय यांचा 375 व्या वैकुंठगमन साहेळ्याचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं. यात कीर्तनकार किशोर शिवणीकर महराराज यानपं सप्ताहातील सुमारे दीड कोटी रुपययांसह पलायन केल्याचं समोर आल्यानंद वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित कीर्तनकाराकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे देखील सांगितलं जात आहे. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवणीकर महाराज अद्याप समोर आलेला नसून, कायदेशीर कारवाईची माग
May 22 min read


महाराष्ट्र बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाकडून आज शनिवार दि. 2 मे 2026 दुपारी 12 बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला. 12 (एचएससी) बोर्ड परीक्षा 10 फेब्रूवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान राज्यात घेण्यात आली. सुरळीतपणे राज्यभरात या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होती. अखेर निकाल जाहीर झाला. बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत निकाला जाहीर करण्यात आला. नेहमीसारखेच राज्यात यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. निकालात मुलींचा टक्का वाढला
May 21 min read


राज्यातील 12 बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मुंबई : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवार दि. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यामिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील 12 बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्
Apr 301 min read
bottom of page