top of page


महाराष्ट्रातील शेतकर्यांना महायुती सरकारचे दुहेरी गिप्ट ; कर्जमाफीनंतर आता थकीत वीजबिलंही माफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई: राज्यातील शेतकर्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकर्यांची तब्बल 48 हजर कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि.15) सत्कार आयोजीत करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले , “ शेतकर्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिज
3 hours ago1 min read


सोनम वांगचुक यांचे 18 व्या दिवशीही उपोषण सुरूच, दोन दिवसात जीवाला धोक्याची शक्यता! दिल्ली हायकोर्टाने दिले केंद्र,आणि दिल्ली सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
नवी दिल्ली: गेल्या 17 दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करत असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिस धाडली आहे. दोन्ही सरकारांना उत्तर देण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली आहे. त्यांचं वजन 8 किलोनं घटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल क
4 hours ago2 min read


मुंबईतील शालिमार आणि नूर मोहोम्मद हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता तुकाराम मुंढेची भेंडीबाजारात मोठी कारवाई; हॉटेलचे परवाने रद्द, आहिल्यानगरमध्ये मावा बनवणार्या कारखान्यांवर छापा
मुंबई: राज्यभरात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम राबवणार्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्ंघन करणार्या हॉटेल- रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईसाठी मोठी चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या
1 day ago2 min read


मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट, खरिप पेरणीचा वेग मंदावला! पावसाची दडी, शेतकरी हवालदील; 65 % पेरणी, लाखमोलाचं बी-बीयाणं मातीत?
बीड : मराठवाड्यात यंदाच्या खरिप हंगामातील परेणीची स्थिती दिवसें दिवस अधिक चिंताजनक बनत आहे. जुलै महिना अर्धा संपवत आला असतानाही विभागात केवळ 65 % पेरणी पूर्ण झाली आहे. पवावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांत शेतकरी अद्याप पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दिवशी 45.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र केवळ 32.15 लाख हेक्टर क्षेतावर झाली आहे. सर्वाधिक पेरणी नांदेड जिल्ह्यात 78%
1 day ago3 min read


सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा आज 16 व्वा दिवस: प्रकृती खालावली , 7 किलो वजन घटले ; दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा- उद्धव ठाकरे
नवी दिल्ली/मुंबई : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे सोमवारी (दि.16) व्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच असून, त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे वजन 7.8 किलोने घटले आहे. रक्तदाबही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ च्या वतिने सोनम वांगचुक यांच्यासह सर्व आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतिने पूर्ण पाठींबा जाहीर करत देशभरातील राजकीय पक्षांना समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन उद्धव ठाकरे
2 days ago2 min read


मद्रास उच्च न्यायालयाच्या गोवंश हत्या बंदी आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली: तामिळनाडूमध्ये गोवंश हत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. गोवंश हत्या हा इस्लाम धर्मातील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याचं नमूद करीत बकरी ईद किंवा इतर कोणत्याही दिवशी तमिळनाडूमध्ये गाय किंवा वासरांच्या कत्तलीवर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने 27 मे रेाजी दिला होता. या आदेशाला तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत
2 days ago1 min read


बीडमधील ज्ञाणेश्वर वाकडे हत्या प्रकरण: सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा, 5 आरोपी गजाआड आरोंपींना आश्रय देणार्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
अंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदूर येथे एका तरुणाची चाकू भोसकून आणि डोक्यात वीट मारून निर्घृण हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. क्षुल्लक वादातून आणि सोशल मीडियावरील वर्चस्वाच्या रागातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पळून जाण्याच्या प्रयत्नात एका आरोपीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, आरोपींना आश्रय देणाऱ्या मंगल कार्यालय मालक आणि व्यवस्थापकावर मुख्य आरोपी म्
2 days ago2 min read


राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; दोघांना अटक भोंदूबाबाला मध्यरात्रीच उचललं, गिरीजा राऊत यांचे गंभीर आरोप
माजी खासदार विनायक राऊत त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील एका भोंदू बाबाला मध्यरात्री उचलण्यात आले आहे. यामुळे राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी राऊत कुटुंबीयांशी वारंवार संपर्क साधण्याच प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या कोणत्याही संपर्काला राऊत कुटुंबाकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा पोलिसांचा दावा आहे. सूनेच्या तक्
2 days ago1 min read


सासवड- जेजूरी मार्गावर पालखी सोहळ्यतील वारकर्यांचा भीषण अपघात; ट्रकची धडक बसून तिन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रुग्णालयास भेट ,प्रशासनाला अवश्यक सूचना
जेजुरी : संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सोमवारी (दि.13 जुलै) सकाळी सासवड- जेजुरी मार्गावर वारकर्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. सासवड येथील मुक्कामानंतर सोमवारी (दि.13) सकाही माऊलींचा पालखी सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या 4 महिलांना तातडीने जेजूरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर वैद्य
2 days ago2 min read


आयएएस तुकाराम मुंडे यांची वारंवार बदली; माजी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विशेष विनंती!
नांदेड: आपल्या धडक आणि कडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिाकरी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता राजकीय नेते उभे राहताना दिसून येत आहे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांची बदली करण्यात येवू नये, अशी विशेष विनंती आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये अयोजित एका पुरस्कार वितरण साहेळ्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण पु
3 days ago2 min read


5 कोटींची कॅश, 21 लाखांचं सोनं, 8लाखांची चादी, 4 रायफल, 2 पिस्तुलं आणि 500 जिवंत काडतूसे छत्रपती संभाजीनगरमध्ये तथाकथित ‘डॉन’ च्या घरी भल्या पहाटेच पोलिसांची छापेमारी
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.10 जुलै) पहाटे केलेली कारवाई राज्यभरात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. नव्वदच्या दशकात शहरात मोठी दहशत असलेल्या एका डॉनच्या घरीच पोलिसांनी पहाटेच धाड टाकली. या धाडीत पोलिसांच्या हाती लागलेल्या काही गोष्टींनी शहरात खळबळ उडाली आहे. एकेकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात डॉन फरजान यांची मोठी दहशत होती. त्यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या विविध कलमांखाली अनेक छोटे- मोठ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले हो
4 days ago1 min read


राज्यातील शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमफी; जाचक अटी रद्द, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरप विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना माहिती दिली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्यवा शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केेली. कर्जमाफीच्या निर्णयासाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो मात्र आम्ही तसं केलं नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस याव
5 days ago2 min read


महाराष्ट्रातील भेसळखोरांचे कंबर्डे मोडणारा ‘ मुंढे पॅटर्न’ आता देशभरात!
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हॉटेल्समधील पदार्थ, दुध, पनीरपासून ते सौंदर्य प्रसाधानापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतील भेसळखोरीचा पर्दाफाश करण्याचा धडका लावला आहे . त्यांच्या या धाड सत्रांची आणि कारवायांची महाराष्ट्रासह देशभरात जोरदार चर्चा आहे. धडक कारवायांचा हाच ‘ मुंढे पॅटर्न’ देशभरातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. आता तेलंगणा, कर्नाटकसारख्या राज्यांत ‘ मुंढे पॅटर्न’ राबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या शेजारतील काही एफडीए अधिकार्
5 days ago1 min read


सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीक्षेपात ‘ रिंग रोड’ भूसंपादानाच्या कामाला वेग; शेतकर्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा दृष्टिपथात ठेवून नाशिक 'रिंग रोड' प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठीच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत 'रिंग रोड'चे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. भूसंपादनासदर्भातील सर्व प्रश्न तातडीने निकाली काढावेत. जिथे राष्ट्रीय महामार्ग आणि 'रिंग रोड'चे आरेखन सोबतच येत असेल, तेथे एकच रस्ता ठेवावा. स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार गुणांक देण्यात यावा. त्यानुसारच भूसंपादनाचा
5 days ago1 min read


राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालाचालींना वेग; सात सदस्यीय समिती गठीत - मुख्यमंत्री
उत्तराखंडनंतर आता महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा अस्तित्वात येणार असल्याचे दिसून येत आहे, त्या संदर्भा हालचाली सुरू झाल्या. असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनात याबाबत महिती दिली होती. समतान नागरी कायद्यासंदर्भात 7 जणांची समिती नेमण्यात येत असून सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सात जणांची समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज समान नागरी कायद्याबाबत पुन्हा एकदा घोषणा केली, ही समिती येत्या सहा महिन्यात अभ्यास करून अह
6 days ago2 min read


भारतात कुठेच नाही ते चौथ्या मुंबईत असेल; नव्या मुंबईला पर्याय तिसरी मुंबई उभारण्यात येत आहे - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी मुंबई उभारली जात आहे. नवी मुंबईच्या पुढे चिरनेर जवळ तिसरी मुंबई उभारली जात आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या अनुषंगाने जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु आहे. तिसरी मुंबई निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथ्या मुंबईची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथी मुंबई कुठे असेल याबाबत विधानसभेत माहिती दिली. मुंब
6 days ago1 min read


राज्यातील 2011 पूर्वीच्या झोपडपट्यांना कायदेशीर मान्यता, महायुती सरकारचा निर्णय
राज्यातील वन विभाग आणि विविध केंद्र आणि राज्य सरकारी प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनीवर 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या सर्व झोपडपट्ट्यांना राज्य सरकारने संपर्णू कायदेशीर संरक्षण देईल, या रहिवाशांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा किवां इतर गृहनिर्माण योजनांमार्फत योग्यरित्या करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबई उपनगर जिल्ह्यासह राज्यभरातील अशा जमिनींवर राहणार्या सर्व रहिवाशांचे सविस्तर सर्वेक्षण पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल,
6 days ago1 min read


मराठवाडा हादरला: परभणी, हिंगोली, नांदेडला भूकंपाचे हादरे गाड झोपेत असताना मध्यरात्री 1:37 वाजता भूकंप; 4.4 रिश्टर स्केल नोंद
परभणी/ नांदेड: महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 1 :37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांवर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या म
6 days ago2 min read


संत श्रेष्ठ ज्ञाणोबा, जगद्गुरु तुकोबांचा पालखी सोहळा पुणे मुक्कामी
पुणे : पुुणे शहरात आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालख्यांचे आगमन झाले. पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गुरूवारी पहाटे 3:00 ते सायंकाळी 5 वाजेपर्यं
6 days ago1 min read


राज ठाकरे प्रचंड संतापले, फडणवीसांचा एकेरी उल्लेख; आरे तु मुख्यमंत्री ना रे महाराष्ट्राचा...-राज ठाकरे
मुंबई : मुंबई- पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ वर दरड कोसळल्याचं दिसून आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधक, नेटीझन्स यांनी सत्ताधारी आणि सरकारला धारेवर धरलं, यावरुन संतापलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटाकरलं. तसेच माझी बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.हीच बाब आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खटकली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि.9जुलै
6 days ago2 min read
bottom of page