top of page


पंतप्रधानांचा उपदेश की, अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता ‘कॉम्प्रमाइज्ड’ पंतप्रधानांच्या बसची गोष्ट राहिली नाही- राहुल गांधी
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे अवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या ‘सल्ल्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “ मोदींनी दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे आहे, “ अशा शब्दांत गांधींनी निशाणा साधला आहे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ एक्स’ वर पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
17 hours ago1 min read


वर्क फ्रॉम होम सोबत आता शाळांनी काही काळासाठी ऑनलाइन क्लासेसची सोय करावी- पंतप्रधान मोदी
पश्चिम आशियात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक देशांवर इंधन संकट कोसळलं आहे. भारतावरदेखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा सल्ला देशातील नागरिकांना दिला आहे. शिवाय पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नये, असंही त्यांनी रविवारी म्हटलं होतं. त्यातच आता शाळांना ऑनलाईन क्लासेस घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी गुजरातमधून केलं आहे. सोमवारी रात्री अयोजीत कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये परदे
18 hours ago1 min read


दरवाढीचा भडका! पेट्रोल 18 रुपयांनी तर डिझेल 25 रुपयांनी महागणार?
भारतात व्यावसायिक सिलिंडरचा भाव काही दिवसांपूर्वी जवळपास 1000 रुपयांनी वाढला आहे. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दरवढीचे संकेतही मिळत आहेत. सरकारी तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटींचा तोटा बसत असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगत इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल 18 रुपये, डिझेल 25 रुपयांनी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतावर जाणवू ला
19 hours ago1 min read


पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं पालन करा- मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या झळा आजही देशवासीयांना बसत असल्याचं दिसून येत आहेत. राज्यात एकीकडे पेट्रोल आणि डिझलची कमतरता जाणवत असून अद्याप घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. सध्या आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली असली तरीही गतकाळातील आणि भाविष्यातील परिस्थितीमुळे देशवासीयांना काही बंधने घालून पुढे जावे लागेल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासीयांना काही महत्वाची अवाहनं केली आहेत. त्यामध्ये वर्षभर
2 days ago2 min read


मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा राजीनामा!
थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळडनाडूमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबदरस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बहुमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या- मोठ्या पक्
2 days ago1 min read


वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्कफ्रॉम होम करा; पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करा- पंतप्रधान मोदी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे भारतात पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच पीएम मोदी यांनी सर्व भारतीयांना महत्वाचे आवाहन केले आहे. वर्षभर सोनं-चांदी खरेदी करू नका आणि पेट्रोल- डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटींग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले. पीएम मोदींनी या आवाहानामागची कारण देखील सांगितली आहेत. पीएम मोदी यांनी तेलंगणात
2 days ago2 min read


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच; 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थांच्या गैरवापराला आळा- मुख्यमंत्री विजय थालापती
आज 10 मे 2026 रोजी, अभिनेते-राजकारणी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर तामिळनाडूचे राजकीय चित्र बदलले. काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून, विजय यांनी शपथविधी सोहळ्याला एक आधुनिक स्पर्श दिला. त्यांनी 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थाविरोधात विशेष दल स्थापन करण्याची घोषणाही केली. वास्तविक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी या तीन घोषणा केल्या. मुख्यमंत्री
2 days ago3 min read


इंडिया आघाडी फुटली?; डीएमकेचा सवता सुभा 22 लोकसभा खासदारांना वेगळ्या आसनव्यवस्थेचं कनिमोझीचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वगे आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरुन पायउतार झाल्या. तर तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तामिळनाडूत टीव्हिके पक्षाची सत्ता येणार आहे. टीव्हिके पक्षाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर डीएमके पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. डीएमके खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून लोकसभेत आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली
4 days ago1 min read


मुंबईमध्ये मेगा रॅम ऋण वितरण,लोकसंपर्क शिबीर संपन्न ग्राहकांना ऋण मंजुरीपत्रांचे वाटप; इंडियन बँकेचे कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन
मुंबई : देशाची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक, इंडियन बँकेने क्षेत्र महाव्यस्थापक कार्यालय, मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी, ज्याचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांमध्ये पसरलेला आहे.एका मेगा रॅम ऋण वितरण व लोकसंपर्क शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचाल आणि मुख्य कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालय मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ग्राहक मान्य
4 days ago2 min read


एसआयआरमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालात 207 जागांसह भाजपने दणदणीत बहुमत संपादन केले आहे. तर 15 वर्षांपासून सत्तास्थानी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष थेट 80 जगांवर फेकला गेला आहे. या सत्ताबदलामागे भाजपच्या राजकीय रणनीतीसोबतच एसआयआर प्रक्रियेमध्ये 34 लाख 35 हजार मतदारांचे विचारात न घेतलेले अपील निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा-2024 निवडणुकीत राज्यातील एकूण मतदारांची संख्या 7 कोटी 60 लाख 10 हजार होती, तर 2021 च्या विधानसीा निवडणुकीत एकूण मतदारांचा आकडा सात कोट
6 days ago2 min read


तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; थलपती विजय यांना जबर धक्का, राज्यपालांचं नियमावर बोट
तामिळनाडू राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुक निकालात अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात उद्य झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमधील प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि डीएमके सारख्या पक्षांचा पराभव झाला आहे. थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये तब्बल 107 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता टीव्हीकेकडे 112 एवढं
6 days ago1 min read


एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी
May 31 min read


राघव चढ्डा यांच्यासह 7 जणांची खासदारकी धोक्यात, ‘आप’ ने आखला प्लॅन
दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी या सर्व बंडखोर खासदारांची राज्यसभा सदस्यता रद्द होणार असल्याचा दावा केला आहे. आता आम आदमी पार्टी बंडखोर खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणार असल्याचेही समोर आले आहे. पीटीआय -भाषाच्या वृत्तानुसार संजय सिंह यांनी राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र पाठवून राघव चढ्डा यांच्यासह राज्यसभेतील त्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची विनंती
Apr 261 min read


तामिळनाडूत ऐतिहासिक मतदान, सर्व रेकॉर्ड ब्रेक! 82.24 टक्के मतदानाची नोंद; मतदारांच्या हायव्होल्टेज करंटने दिग्गजांची झोप उडाली, निकालाची धाकधूक वाढली
चेन्नई: तामिळनाडूच्या 74 वर्षाच्या लोकशाही प्रवासात आज एक नवा मैलाचा दगड गाठला गेला. गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दुपारी 5 वाजेपर्यंत तब्बल 82.24 टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. 3.6 लाख निवडणुक कर्मचारी आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली राज्यात मतदारसंघांत हे मतदान पार पडले. राज्यातील 5.73 कोटी मतदरांपैकी बहुतेकांनी आज मतदानासाठी उत्साह दाखवला. तामिळनाडूच्या निवडणुक इतिहासात 2011 मधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 78.01 टक्के म
Apr 231 min read


पश्चिम बंगालमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट; भाजपच्या महिला आमदाराची गाडी फोडली, उमेदवाराला मारहाण
पश्चिम बंगाल विपधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया गुरूवारी सकाळपासून सुरू होती. मतदारांकडून उत्स्फूर्तपणे मतदान करण्यात केले गेले, दुपारी तीन वाजेपर्यंत 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. एकीकडे छप्परफाड मतदान होत असताना काही ठिकाणी हिंचाराच्या घटनाही घडल्या. एका ठिकाणी भाजप आमदाराची गाडी फोडण्यात आली असून उमेदवारालाही मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. एका मतदान केंद्राजवळ गावठी बॉम्ब फेकण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले. बंगालमधील कुमारगंज विधानसभा
Apr 232 min read


महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं केंद्र सरकारला धक्का, इतर दोन विधेयकं सरकारडून मागे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकानं संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक 2026, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 आणि सीमांकन विधेयक, 2026 लोकसभेत सादर केली होती. या विधेयकांच्या बाजूनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी भूमिका मांडली. तर, विरोधी पक्षांकडून अखिलेश यादव, प्रियांका गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अरविंद सावंत, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, कल्याण बॅनर्जी यांच्यासह विरो
Apr 172 min read


यमूनेत पंजाबच्या भाविकांची बोट उलटली, 30 बुडाले 10 जणांचा मृत्य
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे शुक्रवारी एक भीषण अपघात घडला. यमुनेच्या पात्रात भाविकांनी भरलेली एक बोट (स्टीमर) उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बोटीमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते. यातील अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भक्तीच्या वातावरणात बुडालेल्या वृंदावनमध्ये आज एका भीषण दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. यमुने
Apr 102 min read


सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही
नाशिक : प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री
Apr 52 min read


महिनाभरात राज्यभर मोफत विज, गोव्यात अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
पणजी/ पोंडा: आम आदमी पार्टीने गोव्यातील पोेंडा पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल यांनी पोंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश यांच्या समर्थनार्थ एका ‘परिवर्तन सभे’ ला संबोधित केले. त्यांनी गोव्याच्या जनतेला थेट आवाहन केले, “ 2027 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ ला संधी द्या, आणि आमचे सरकार स्थापन होताच, आम्ही एका महिन्यात संपूर्ण गोव्यात विज मोफत करण्याचे अश्वासन अरविंद केजीरीवाल यांनी यावेळी दिले. पोेंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्य
Apr 22 min read


अमेरिका, इस्त्रायल - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात लाकडाऊन? केंद्र सरकारची स्पष्ट घोषणा
नवी दिल्ली: भारतीय नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण तयार झाले होते. पश्चिम आशियातील तणाव आणि ईराण - अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अनेक गोष्टी महागाल्या आहेत अशी चर्चा आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चिंता वाढली. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि त्यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्यांचा लोकांनी चुकीचा अर्थ घेतला. यामुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. या अफवांमुळे लोकांमध्ये “ भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे का?” अशी चिंता निर्माण
Mar 272 min read
bottom of page