top of page


पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नवीदिल्ली : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली, पाच राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील
6 days ago2 min read


एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर एनसीएल च्या संशोधकांनी शोधला पर्याय
एलपीजी प्रमाणेच डिएमई गॅसचा शोध; पुण्याच्या पिरंगूटमध्ये कारखाना पुणे : इराण- इस्त्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसली आहे. विशेषत: पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. भारतात घरगुती गैस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अर्थात नॅ
7 days ago2 min read


गॅस तुटवडा : चिंताग्रस्त हॉटेल व्यवसायिकांची सरकारकडे धाव मंत्री भुजबळांचा केरोसिन वापरण्याचा सल्ला पण...
मुंबई : आखाती देशातील युद्धांमुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता शहरातील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. व्यवसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने शहरातील हॉटेल व्यवसायिकांची चिता वाढली आहे. सध्या काही हॉटेल्सकडे असलेल्या शिल्लक गॅस साठ्यावर व्यवसाय सुरू असला, तरी परिस्थिती कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत सुमारे 20 टक्के हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की
Mar 112 min read


घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले; देशभरात एस्मा लागू
अमेरिका-इस्त्रायल -इराण युद्घामुळे जगभरात कच्चा तेलाचे भाव वाढले आहे. एलपीजी सिलिंडेरचे दर तीन दिवसापासून वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल, गॅस यांचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीमवर पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचा फटका थेट सामान्य घरगुती ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅसचे वितरण सध्या सुरळीत सुरू आहे. पण व्यवसायिक गॅसबाबत काही ठिकाणी काळाबा
Mar 102 min read


भारताचे फायटर जेट सुखोई रडावरून गायब, पायलट बेपत्ता; आसाममध्ये विशेष पथक रात्रीच जंगलात ‘सर्च ऑपरेशन’
आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी 7:00 वाजाता भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू- 30 एमकेआय विमान रडावरून गायब झाल्याची धक्कादायक माहिती नरेंगी येथील संरक्षण जनसंपर्क अधिकार्यांनी दिली आहे. विमानातील एक फायटर पायलट बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि पायलटचा शोध घेण्यासाठी संरक्षण दलाचे शोध पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. संरक्षण दलाच्या शोध पथकाने आसामच्या जंगलात रात्रीच ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले आहे.
Mar 51 min read


आयुष समग्र क्रांतीचे दर्शन... राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी अनुभवली भव्य आरोग्य प्रदर्शनी !
बुलढाणा: भारताच्या महामाहीम राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याहस्ते आज बुधवार (दि.25) श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय ‘ राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’ चा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांनी मेळाव्यातील भव्य आरोग्य प्रदर्शनीच्या विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहाणी केली. पारंपारिक चिकित्सा पद्धती आणि आधुनिक आरोग्य सुविधांचा संगम असलेल्या या प्रदर्शनाने र
Feb 251 min read


कर्नाटकात नेतृत्व बदलाचे वारे, मुख्यमंत्री सिद्धरामैया विरोधात आमदार एकवटले
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी नेतृत्व बदलाची उघडपणे मागणी केली आहे. डी.के. शिवकुमार 26 फेब्रूवारी रोजी दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांकडची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लिंगायत आणि वोक्कालिगा मतदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे. रविवारी (दि.22) काँग्रेस आमदार एच.ए.इक्बाल हुसेन यांनी नेतृत्व बदलाच्या मागणीला दुजोरा
Feb 221 min read


शिवनेरीवर अजितदादांच प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त झाले - मुख्यमंत्री फडणवीस
पुणे : अजितदादाचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती क, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू, मला सांगताना आनंद वाटतोय की, पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्स सोहळा शिवनेरी येथे पार पडला. या कार्यक्रमातून ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भारताचा भूगोल
Feb 192 min read


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीना घरात घुसून गोळ्या घालण्याची भाजपच्या पदाकिार्याची धमकी
काँग्रेसच्या 25 खासदारांनाही धमकी; काँग्रेससह समविचारी पक्षांकडून निषेध नवीदिल्ली: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप आणि करणीसेनेच्या एका पदाधिकार्याने सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू ’ अशी धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या 25 खासदारांना देखील त्याने धमकी दिली आहे. या व्हिडीओमुळे मिडीयावर खळबळ उडा
Feb 192 min read


यवतमाळ, अहिल्यानगरमध्ये एटीएसचे एकाच वेळी छापे सशयितांची कसून चौकशी, मोबईल फोन, कागदपत्रे आक्षेपार्हसाहित्य ताब्यात
मुुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही जिल्ह्यांतील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान एक डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील काह
Feb 151 min read


तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भजापला
Feb 142 min read


पेंग्विन इंडिया खोटं बोलत आहे,..मला लष्करप्रमुख नरवणे यांच्यावर विश्वास - राहुल गांधी
नवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे आत्मचरित्र “ फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी” ने देशात अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण केला आहे. संसदेपासून रस्त्यांपर्यंत या गोंधळाच्या केंद्रस्थानी राहुल गांधी यांनी सभागृहात पुस्तकाची प्रत दाखवून त्याला “ सत्याचा दस्तऐवज ” असे संबोधून स्वत:ला दूर करत असताना, जनरल नरवणे यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्टने हा दावा उघड केला आहे. या विषयावर प्रश्न असा आहे की, जर पुस्तक प्रकाशित झालेच नसेल, तर माजी लष्करप्रमुखांनी स्वत:त्याच्या “ उपलब
Feb 102 min read


विरोधीपक्षाचं लोकसभेच्या गेटवर आंदोलन; बघा गद्दार चालले, काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या मंत्र्याला राहुल गांधीनी डिवचले, शाब्दीक चकमकीचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली: देशाचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत दोन दिवसांपासून जोरदार घमासाण सुरू आहे. या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही, त्याआधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे. यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज अनेकवेळा तहकुबही करण्यात आले. याचमुद्यावरुन संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात बाचाबाचीचा प्रकार समोर आला आहे. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला
Feb 41 min read


केंद्र सरकारचा 2026-27 चा अर्थसंकल्प जाहीर केंद्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला अर्थसंकल्प: दारू, सिगारेट महागणार, एप्रिलपासून देशात नवा आयकर लागू
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 2026-27 चा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.परिवहन मंत्रालयाला सार्वात जास्त बजेट वाटप मिळाले आहे. सरकारने परिवहनासाठी 5,98,520 कोटी रुपये वाटप केले आहेत, तर संरक्षण मंत्रालय दुसर्या क्रमांकावर आहे, ज्याला 5,94 585 कोटी रुपये मिळाले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय 2,73, 108 कोटी रुपयांसह तिसर्या क्रमांकावर आहे, गृह मंत्रालय 2, 55, 234 काटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे, कृषी मंत्रालय 1, 62, 671 कोटी रुपयांसह पाचव्या क्रमांकावर आ
Feb 12 min read


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अटकेची टांकती तलवार ईडीच्या छापेमारीत अडथळा; स्वत: फाइल्स पळवल्याचा अधिकार्यांचा आरोप
ईडीच्या छाप्यांमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबह उडाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने गुरूवारी पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्म आय-पीएसी आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईनंतर घडलेल्या घडामोडींमुळे हा विषय केवळ तात्पुरता मर्यादित न राहता थेट राजकीय संघर्षात बदलला आहे. ईडीच्या छप्याच्यावेळी थेट कार्यालयात घुसून कागदपत्र आणि फायली आपल्यासोबत ममता बॅनर्जी घेऊन गेल्या. त्यांची हीच कृती त्यांना आत
Jan 92 min read


बीडमध्ये एटीएसची मोठी कारवाई, धार्मिक कार्याच्या नवाखाली बनावट ट्रस्टचा पर्दाफाश ; 4 कोटी 73 लाखांवर रक्कम जप्त
बीड: जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत धार्मिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणार्या बनावट ट्रस्टचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून ट्रस्टच्या चार विश्वस्तांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध ट्रस्ट आणि स्वयंसेवी स
Jan 92 min read


अतिवृष्टीच्या मतदीवरुन खासदार ओमराजे निंबाळकरांसह 25 खासदारांचा केंद्रीय कृषीमंत्र्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
नवीदिल्ली: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात सप्टेंबर- आक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा तडाखा बसला होता. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती ओढावली होती. यात शेतकर्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. सरकारनं 32000 कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं. पण ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप नुुकसानग्रस्तांसह विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये आणखी खटकणारी बाब म्हणजे राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं
Dec 11, 20252 min read


पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ईडी, एटीएसचे संयुक्त छापेदहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत; अनेक घरावर धाड
ठाणे: पडघा येथील बोरिवली गावात ईडी आणि एटीएसकडून रात्रभर संयुक्त छापेमारी करण्यात आली. दहशवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कुख्यात बोरिवली गावात रात्री उशिरा ईडी आणि एटीएसच्या अधिकार्यांनी कारवाई केली. पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर अनेक घरांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. एका दहशवादाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना अर्थ सहाय्य केल्याप्रकरणी ईडी, एटीएस तपास करत आहे. या तपासात पडघ्यातील बोरिवली गावात घरांवर मोठी कारवाई करण्यात आली. दहशवादी कृत्
Dec 11, 20252 min read


महामानवाला अभिवादन! मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थणा, प्रधानमंत्री मोदींनीही वाहिली आदरांजली
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजालादिशा देतो. भारताची सार्वभौमता राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभारातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक
Dec 6, 20252 min read


दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक ; 11 जणांचा मृत्यू 40 जण जखमी
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात झालेल्या भिषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दोन सरकारी बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अपघातानंतर बसच्या ढिगार्यात नऊ महिला आणि दोन पुरुष अडकलेले आढळले. ज्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तात्काळ कराईकुडी आणि तिरुपत्तूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक चालक आणि रहिवाशांनी तातडीने बचाव कार्यात मदत केली. मदुराईहून कराई
Nov 30, 20251 min read
bottom of page