top of page


जामखेडमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश; राहुरी तालुक्यातील दोघे ताब्यात
अहिल्यानगर/ राहुरी : तालुक्यातील फक्राबाद परिसरात शनिवारी (दि.14) अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दुध भेसळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राहुरी (जि. आहिल्यानगर) तालुक्यातील दोघांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी पोलिस निरिक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गेणश शिवानाथ लबडे यांनी स्वतंत्र पंचांसह फक्राबाद येथे तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहन क्रमांक एम.एच.17 के 7946 उभे आढळले. वाहनात
10 hours ago1 min read


यवतमाळ, अहिल्यानगरमध्ये एटीएसचे एकाच वेळी छापे सशयितांची कसून चौकशी, मोबईल फोन, कागदपत्रे आक्षेपार्हसाहित्य ताब्यात
मुुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही जिल्ह्यांतील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान एक डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील काह
12 hours ago1 min read


पुण्यात भाजपच्या आंदोलनात राडा! भाजप- काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने; तुफान दगडफेक, पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह पत्रकार पोलिसही जखमी
पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कायकर्ते आक्रमक झाले, काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून काही पत्रकार आणि पेालिसांनाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. रविवारी (दि.15) सकाळी
12 hours ago2 min read


मंत्रालयातील लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्विकारताना अटक; मंत्रालयातील घटनेने खळबळ
मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात 'एसीबी'ने मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली असून राजेंद्र ढेरंगे असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी 50 हजारांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही अटक करण्यात आली आहे. मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. सबंधित कामाची तक्रार आल्या
3 days ago1 min read


अपह्रत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून मारहाण पोलिस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
बीड : अल्पवयीन मुलीचे अहपहरण झालेल्या पिडीत कुटुंब, नातेवाईक तपासाची माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले असता पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी नेकनुर पोलिसात सात जणांसह इतर एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. धावज्याचीवाडी येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मारहान करून
4 days ago2 min read


कलाकेंद्रातील नृत्यांगनावर बीडमधील युवकाचा प्राणघातक हल्ला नंबर का ब्लॉक केला म्हणत कोयत्याने सपासप वार; जखमी नृत्यांगनावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
जामखेड: कलाकेंद्रात काम करणार्या एका नृत्यांगनावर तीच्याच मित्राने कोयत्याने सपासाप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) जामखेड (आहिल्यानगर) घडली आहे. जखमी नृत्यांगनावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नृत्यांगनाच्या फिर्यादीवरुन बीडच्या तरुणा विरोधात जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड येथील एका कला केंद्रात काम करणार्या नृत्यांगनावर राहुल अशोक कचरे रा. खळेगाव (ता.गेवराई, जि. बीड) येथील कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नृत्यांगन
7 days ago2 min read


झेडपी निवडणुकीत ईव्हिएम मशिन धाब्यावर! सोलापूरच्या मोहोळमधील प्रकार; प्रशासनाचा मशिन ‘राखीव’ असल्याचा खुलासा
सोलापूर : सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ईव्हिएम मशिन थेट हॉटेलवर सापडल्या. मतदान झाल्यानंतर चक्क हॉटेलवर ईव्हिएम सापल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर ज्या ईव्हिएम मशिन स्ट्राँग रुममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं ईव्हिएमध्ये हेराफेरी करण्यासाठी
Feb 81 min read


धारूर आगारातील कर्मचार्याची मांजराच्या रॅम्पला गळफास घेवून आत्महत्या
बीड: बीडच्या धारूर आगारात कार्यरत असलेल्या बसचालकाने केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या रॅम्पच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील धनेगाव येथील रहीवाशी आत्मलिंग नामदेव गुजर यांनी शनिवारी (दि.7) सायंकाळी 6:45 च्या सुमारास धनेगाव येथील मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या रॅम्पच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत आत्मलिंग गुजर यांचे चुलत भाऊ विश्वनाथ रामलिंग
Feb 81 min read


25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी 31 सरकारी बाबुंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या , जालन्यात मोठी कारवाई; 22 तलाठी 5 महसूल अधिाकर्यांचा समावेश, महसूल विभागात खळबळ
जलना/ अंबड/ घनसांगवी: नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातून मसोर आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणार्या सरकारी बाबूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधकिरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्याचा समावेश आहे. जलना जिल्हाउद शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या 25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याने हादरला आहे. या प्रकरणात च
Feb 32 min read


उसणे दिलेले पैसे परत मागितल्याचा राग: मित्रानेच केला मित्राचा घात रायमोहातील खुनाचे गुड उलगडले; स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या
बीड: जिल्ह्यातील रायमोहा (ता. शिरुर कासार) जवळील दगडवाडी शिवारात सोमवारी (दि.2) राजुरी नवगन -चिंचपूर मार्गावर बाजूच्या खड्यात चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी वय 30 रा. रायमोहा याचा मृतदेह अढळून आला होता. व्यवसायाने पेंटर असलेल्या चाँदच्या हत्येने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर खुनाच्या तपासाचे मोठे अव्हान होते मात्र, पोलीस अधिक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशाने पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण होताच
Feb 32 min read


मुंबईत अलर्ट: 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता 8 अल्पवयीन मुलींचा समावेश, मानवी तस्करी करणारी टोळी सक्रिय ?
मुंबई: मुंबईतील विविध भागातून 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता मुलांमध्ये आठ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईपोलिसांनी अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवली असून माणवी तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील 7 विविध पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहे
Feb 22 min read


बीड हादरलं: रायमोहात दगडाने ठेचून तरुणाचा खून पेंटींग काम करणार्या तरुणाची निर्घुन हत्या, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली
बीड : डोके दगडाने ठेचून युवकाचा निर्घुन खून केल्याची घटना रायमोहा (ता. शिरुर कासार) येथे सोमवारी (दि.2) उघडकीस आली. चांद अल्हाहुद्दीन तांबोळी वय 30 वर्षे रा. रायमोहा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेंटीग व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. पाटोदा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायमोहा येथील चांद अल्हाहुद्दीन तांबोळी हा पेंटींग व्यवसाय करत होता. रविवारी (दि.1 फेब्रूवारी) सकाळी बीडला जातो
Feb 22 min read


आलोक सिंह हत्या प्रकरणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन
मुुंबई : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे आलेक सिंह असून ते विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते शनिवारी मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना ओंकार शिंदे याच्याशी त्यांचे भांडण झाले. त्यावेळी ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. पोटात खोलवर घाव झाल्याने प्रचंड रक्तस
Jan 272 min read


लातूरमध्ये काँग्रेसच्या झेडपी महिला उमेदवार पतीसह गायब! हळदी कुंकवला गेल्या, पण परतल्याच नाहीत; काँग्रेस पदाधिकार्यांचा भाजपवर अपहरणाचा आरोप
लातूर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लातूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवारोच अपहरण झाल्याच गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. औसा विधानसभा मतदारासंघाच्या निलंगा तालुक्यातील उनसूचित जमाती प्रवर्गाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे 24 जानेवारी रोजी अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम
Jan 261 min read


छत्रपती संभाजीनगरात आढळल्या दोन बांगलादेशी महिलां बीडबायपासच्या हॉटेल व्हाइट हाऊसवर एटीएसचा छापा
छत्रपती संभाजीनगर: शहरातील बीड बायपासवरील व्हाइट हाऊस लॉजिंग अॅन्ड बोर्डिंगमध्ये दोन बांग्लादेशी महिला मिळून आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने हॉटेलमालकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांत बुधवारी (21 जानेवारी ) गुन्हा दाखल केला आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस निरिक्षक राजेश मयेकर यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (19 जानेवारी) एटीएसला गोपनिय महिती मिळाली की, व्हाइट हाऊस लॉजिंग अॅन्ड बोर्डिंग येथे बांगलादेशी महिलांना थांबवून ठेवले आहे. पथकाने स
Jan 261 min read


भाजप कोणार्कचा हायहोल्टेज ड्राम, भिवंडीत 44 जणांना अटक 470 जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी: भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजय उमेदवार आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात माजी महापौर प्रतिभा पाटील जखखमी झाल्या आहेत. जखमी प्रतिभा पाटील यांना उपचारासाठी रुग्णानलयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारे आमदार महेश चौघुलेंच्या मुलाचे समर्थक असल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. भाज
Jan 192 min read


मुंबईत भर रस्त्यावर तरुणाकडून गोळीबार: नागरिक दहशतीखाली, परिसरात खळबळ
मुंबई: महापालिका निवडणुका होऊन काही तास उलटताच गोळीबाराची घटना घडली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत शहरात भररस्त्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. लोखंडवाला बँक रोड परिसरामध्ये अज्ञांताकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे
Jan 181 min read


परांड्यात घरावर गुलाल उधळल्याचा जाब विचारल्याने राडा; 40 जणांच्या टोळक्याकडून दगडफेक, मारहाण वाहनांची तोडफोड
धाराशिव: परांड्यात घरावर गुलाल का उधळला, याचा जाब विचारल्यावरून 40 जणांच्या टोळक्याने एकास मारहाण करत घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. या प्रकरणी परांडा पोलिस ठाण्यात तब्बल 40 जणांविरुद्ध इम्राण गणी कुरेशी (रा. कुर्हाड गल्ली, दर्गा रोड परंडा) यांच्या फिर्यादीवरून दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जानेवारी 2026 रोजी रात्री. 8:30 वाजण्याच्या सुमारास परंडा शहरातील कुर्हाड गल्ली, दर्गा रोड भागत घडली. फिर्यादी इम्रान कुरेश
Jan 171 min read


महाराष्ट्र हादरला, एमपीएसी 2012 चे टॉपर वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतअवस्थेत अढळले
बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस प्रशासानाकडून सखोल तपास सुरू आहे. अधिक माहिती अशी की, सचिन जाधवर यांच्या पत्नीने आज सकाळी ते रात्री घरी परत न आल्याने शिवाजीनगर
Jan 172 min read


मतदनापूर्वी नवी मुंबईत पाचशे च्या नोटांनी भरलेली बॅग आढळली खारघरमधील प्रकार, पाकीटामध्ये भरलेल्या अढळल्या पाचशेच्या नोटा
मुबई: निवडणुक हा लोकशाहीचा उत्सव आहे, याच लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचे महापात महापालिका निवडणुकीत घडत असल्याचे आनेक उदाहरणं समोर येत आहेत. राज्यातील 29 महापालिका निवडणुक मतदनाला काही तास आवधी उरला आहे. नामनिर्देशनपत्र सादर करण्यापासून मागे घेण्याची प्रक्रिया असो वा प्रचार या सगळ्या प्रक्रियेत नियमांची ऐशी तैशी दिसून आली. अगदी जाहिर प्रचारातून आरोप- प्रत्यारोपांसह उमेदवारांच्या भाषेची ढासळलेली पातळी. पण आता त्याहूनही भयंकर कृत्य समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडण
Jan 141 min read
bottom of page