25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी 31 सरकारी बाबुंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या , जालन्यात मोठी कारवाई; 22 तलाठी 5 महसूल अधिाकर्यांचा समावेश, महसूल विभागात खळबळ
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 2 min read

जलना/ अंबड/ घनसांगवी: नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातून मसोर आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणार्या सरकारी बाबूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधकिरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्याचा समावेश आहे.
जलना जिल्हाउद शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या 25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याने हादरला आहे. या प्रकरणात चक्क सरकारी बाबूंनी ‘ शेतकरी’ बनून तिजोरीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात समोर आला आहे.
अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणार्या 31 आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा समावेश असून, या मोठ्या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसांगवी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केलेले अनुदान गरजू शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, येथील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्यांनी संगनमताने एक भयानक कट रचला. बनावट नावे आणि नोंदी करून ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत घुसडण्यात आली धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे ‘लॉगिन’ आणि ‘पासवर्ड’ चोरून प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आले. घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला.
जिल्हाधिकार्यांनी चौकशी समितीने या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच आरेापींनी मोबाईल बंद करून आणि सोशल मीडियापासून लांब राहत भूमिगत होण्याचा प्रयत्न केला. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत 31 आरोपींना बेड्या ठोकल्या.
दरम्यान, आरोपींनी अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. तपास अधिकार्यांनी मांडलेले ठोस पुरावे आणि घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.
मालमत्ता जप्त होणार, बँक खातीही सील!
या घोटाळ्यात आतापर्यंत 35 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी 31 जण कोठडीत आहेत. उर्वरित 4 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींच्या बँक खात्यांवरही टाच आणली आहे. काही आरोपींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आला आहे. डिजिटल पुराव्यांसाठी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
कोण आहेत आरोपी: तलाठी 22, तहसील कर्मचारी 5, जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी 1
दरम्यान, अंबड आणि घनसांगवी तहसीलमध्ये लॉगिन पासवर्डचा गैरवापर करून हा कोट्यावधींचा अपहार करण्यात आला आहे. आतापर्यंत 31 जणांना अटक करण्यात आली असून, तांत्रिक पुरव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. कोणालाही सोडले जाणार नसल्याची माहिती जालन्याचे पोलिस निरिक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) मिथुन घुगे यांनी दिली आहे.



Comments