top of page


महाराष्ट्रदिन विशेष : महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हणाचा सर्पराज्ञीत सौंदर्य श्रृंगार
वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जेव्हा सृष्टी निष्पर्ण होते, तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपुष्प ‘ताम्हण’ जांभळ्या रंगाच्या विविध छटांचा मुकुट चढवून दिमाखात उभा राहतो. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव येथील ताम्हण वृक्षाला आलेला फुलांचा बहर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. निसर्ग सौंदर्याचे प्रतीक तागडगावच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र परिसरात ताम्हणाचे झाड जांभळ्या रंगाच्या विविध रंगछटांच्या फुलांनी लगडले आहे. कोठे गडद जांभळा, कोठे फिकट लव्हेंडर, तर कोठे गुल
6 days ago2 min read


महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्या
Apr 272 min read


उष्णतेचा कहर! अकोल्यात पारा 46 अंशावर, परभणीत उष्माघाताचा मृत्यू ; राज्यात अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी
मुंबई: राज्यभरात उष्णतेचा पारा प्रंचडं वाढला आहे. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडखा वाढत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. आकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तपामाण 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचाबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अकोल्यात तपामानात सातत्याने वाढ ह
Apr 262 min read


राजा कायम राहील पण..., यंदाही महापूर..; देशाची संरक्षस्थिती तणावात! भेंडवळ घटमांडणीच्या भाकिताचे निष्कर्ष समोर
बुलढाण्यामधील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला सुमारे 370 वर्षापासूनची असलेल्या भेडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सुर्यास्तच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सुर्यादयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. घट मांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील मात्र ते तणावात राहती
Apr 202 min read


बारामतीत 6 तर राहुरीतील चार उमेदवारांनी घेतली माघार पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी; पार्थ पवार पाठोपाठ नितेश राणेंचा काँग्रेसवर निशाना
बारामती/ राहुरी: राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका धेतल्याने बारामतीत पोटनिरवडणुक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिवशी आणखी काही घडामोडीची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. त्यातच आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील रा
Apr 82 min read


एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर एनसीएल च्या संशोधकांनी शोधला पर्याय
एलपीजी प्रमाणेच डिएमई गॅसचा शोध; पुण्याच्या पिरंगूटमध्ये कारखाना पुणे : इराण- इस्त्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसली आहे. विशेषत: पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. भारतात घरगुती गैस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अर्थात नॅ
Mar 142 min read


जिष्णू देव वर्मा महराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत. सुरुवातील मुख्य सचिव राजेश
Mar 102 min read


महाराष्ट्र प्रदूषण नियंतण मंडळाचा औद्योगिक अस्थापनांसाठी मोठा निर्णय; संमतीपत्र मंजूरी व नुतनीकरणाचा कालावधी केला 50 टक्क्यांनी कमी
मुंबई: राज्य शासनाच्या इज ऑफ डुईंग बिजनेस धोरणातंर्गत राज्यातील लाल, नारिंगी आणि हरित आस्थापनांच्या उदयोग उभारणी, संमतीपत्र मंजुरी व त्याचे नुतनीकरण यासाठी मंजूर करण्याचा कालावधी हा ५० टक्क्यांपेक्षा कमी केल्याने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाचे इज ऑफ डुईंग बिजनेस धोरण व राज्य शासनाने आखलेले विकसित महाराष्ट्र २०४७ या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना हरित संवर्गातील उदयोग उभारणीसाठी, उदयोग सुरू
Feb 241 min read


महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट , 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानत काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमान वाढ होताना दिसत आहे. वातावरण गरमी जाणवत असताना अता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकून 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्
Feb 231 min read


कर्तव्यापलिकडच्या निसर्गदूताने दिला मानवतेचा संदेश कार्यालयाच्या आवारात तहसीलदाराने स्वखर्चाने केली वृक्षलावगड; झाडे जगवण्यासाठी घेतला पुढाकार
बीड : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरुप प्राप्त होणं महत्वाचं आहे. वृक्षलागडीचे फलित होण्यासाठी वृक्ष संरक्षण, संवर्धनाच्या उपाय योजनां चळवळीमध्ये रुपांतरीत होणं गरजेचं आहे असाच संदेश देत बीडच्या शिरुर कासारचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्यातील निसर्गदुताने दिला आहे. नैसर्गीक साधनसंपत्तीचे जतन, हाच पर्यावरणीय बदलांवर उपाय हे सुर्य प्रकाशाइतके सत्य आहे. वातावरणातील नैसर्गीक बदलांमुळे माणुस खडबडून
Feb 201 min read


कोल्हापूर जिल्ह्यातील वनपर्यटन प्रकल्प मोडकळीस! देखभालीअभावी कोट्यावधींची सामग्री धुळ खात पडून, पुनरुज्जीवनर, सक्षम व्यवस्थापनाची गरज
कोल्हापूर: जिल्ह्यातील वनंसवर्धनासोबत जनजागृती आणि पर्यटनपूरक सुविधा उभारण्याच्या उद्देशाने वनविभागाने काही महत्वकांक्षी प्रकल्प राबविले. मात्र, देखभाल आणि व्यवस्थापनाअभावी सहा ठिकाणांच्या प्रकल्प सुविधा मोडकळीस आल्या आहेत. सुमारे पाच कोटीचीं साधनसामग्री धूळ खात पडून आहे. या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून सक्षम व्यवस्थापन केल्यास पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळू शकतील आणि वनविभागालाही महसुलाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मात्र, याबाबत संबंधित अधिकार्यांची भूमिका काय असेल? याकडे लक्
Feb 192 min read


गडकिल्ल्यांची स्वच्छता संवर्धन व जतन मोहिम लोकमंत्र व्हावा; महाराष्ट्र प्रदूषण यंत्र मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांचे शिवजयंतीदिनी प्रतिपादन
युनेस्कोने दर्जा दिलेल्या राज्यातील ११ गडकिल्ल्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित स्वच्छता व संवर्धन मोहिम “मानाचा मुजरा, हटवूया कचरा” या जनजागृती उपक्रमाचे आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले सुवर्णदुर्ग दापोली येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी राज्यातील युनेस्कोने दर्जा दिलेल्या अकरा गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन व जतन ही मोहीम हा लोकमंत्र होण्याची गरज आहे असे प्रतिपादन या यावेळी केले
Feb 191 min read


मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
नांदेड: मुखेड तालुक्यातील आज (दि.11 फेब्रूवारी2026) दुपारी 3:25 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता धक्यांची नोंद झाली असून याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंदविण्यात आली आहे. नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांना आज दुपारी 3:25 वाजता भुकंपाचे तीव्र धक्क
Feb 111 min read


महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स मुल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पाचव्या स्थानी
मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ई-गव्हर्नन्स मूल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ५वा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील ९७ मंडळे, महामंडळे व प्राधिकरणांशी स्पर्धा करत, ई-गव्हर्नन्स श्रेणीतील विश्लेषणात मंडळाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. हे महत्त्वपूर्ण यश डिजिटल परिवर्तन, तंत्रज्ञानाधारित प्रशासन तसेच नागरिक-केंद्रित सेवा पुरविण्याबाबत मंडळाच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे राज्यातील सर्व भागधारक
Jan 261 min read


र्पराज्ञीत निष्पर्ण झाडावर नखशिखांत सौंदर्याचा बहर! लाल - पिवळ्या फुलांनी सोनसावर ,काटेसावर बहरली...
बीड :सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रातील सांस्कृतिक नंदनवनात निष्पर्ण झालेली दुर्मिळ वृक्ष सोनसावर ,काटेसावर सोनेरी पिवळ्या, लाल रंगांच्या फुलांच्या सौंदर्याने नखशिखांत बहरली आहेत. सर्पराज्ञीत गेल्या सात वर्षांपूर्वी सर्पराज्ञीचे मार्गदर्शन आदरणीय क्षितिज हीर्लेकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक नंदनवन निर्माण करण्यात आले होते. या नंदनवन मध्ये 30 प्रकारच्या वनांची निर्मिती करण्यात आली होती. मध्यंतरी आग लागू या वनातील काही वृक्ष जवळ नष्ट झाली मात्र काही प
Jan 241 min read


दुर्मिळ शृंगी घुबडास मिळाले माजी न्यायमूर्तीचे पालकत्व! सर्पराज्ञी प्रकल्पास अचनक सहकुटुंब भेट, निसर्ग संवर्धनाच्या कार्यावर समाधान
बीड: तंत्रज्ञाणाच्या युगामध्ये यंत्रा, तंत्राला देवत्व बहाल करणार्या मानव जातीस नैसर्गीक साधन, संपत्तीचा विसर पडत चालला आहे. निसर्गापुढे माणुस पालापाचोळा आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण, संवर्धन हीच खरी मानवता, ती टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणार्या सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्या कार्याने प्रभावीत होवून माजी न्यायमूर्ती डी. के सोनवणे यांनी आज प्रकल्पातील दुर्मिळ शृंगी घुबडाचे पालकत्व घेवून निसर्ग संवर्धनाचा संदे
Dec 29, 20251 min read


बीडची सह्याद्री- देवराई सुरक्षीत, आगीच्या आफवाच!
बीड: गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही माध्यमांतून “ सह्याद्री-देवराई येथे भिषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपाद नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णत: चुकीच्या व दिशाभूल करणार्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात सह्याद्री- देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे 20 गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे,
Dec 27, 20251 min read


वन जमिनीवर शेती करता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली: वन जमीन शेतीसाठी वापरण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वन जमीन वापराबद्दल कायद्याचे उल्लंघन करू नये. असा संदेश सर्वोच्च न्यायालयाने निकालातून दिला आहे. कर्नाटकातील गांधी जीवन सामुहिक शेती सहकारी संस्थेला कर्नाटक सरकारने 134 एकर राखीव जंगलाची जमीन शेतीसाठी भाडेपट्याने दिली होती. हा भाडेपट्टाने दिली होती. हा भाडेपट्टा बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्याची मुदतवाढ मागण्यात आली. परंतु याबाबतची याचिका फेटाळ
Dec 27, 20252 min read


वाळू माफियांचे आड्डे उद्ध्वस्त करणार, लवकरच मोठी कारवाई- मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
नागपूर: भंडारा- गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू माफिया सबंधित पुरावे दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी वाहफ रॅकेट पूर्णपणे उद्धवस्त करण्याचे अश्वासन दिले.पडोळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे सादर केले. डॉ. पडोळे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, ब्रम्हपुरी तहसीलमधील बोंडेगाव परिसरात वाळू भरणार्या हजारो वाहनांना 25 किलोमिटर अंतरावर असलेल
Dec 15, 20252 min read


हिंगोली पुन्हा भूकंपाने हारलं; औढा तालुक्यात भूकंपाचे धक्के!
हिंगोली: हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला आहे. काही दिवसांपूर्वी वसमत तालुक्याला भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आज बुधवारी हिंगोलीतील औंढा तालुका भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाने गावातील लोकांची एकच पळापळ झाली. भूकंपाच्या धक्याने गावकर्यांमध्ये भीती पसरली आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये 3 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 49 मिनिटांनी भूूकंपाचे धक्के जाणवले होते. पांगरा शिंदे आणि परिसरला भूकंपाचे धक्के बसले. या भागात भूगर्भातून अचानक मोठा आवाज आल्यानंतर जमीन हादरली होती. त्या
Dec 10, 20251 min read
bottom of page